Homeकल्चर +मुंबईत उद्यापासून रंगणार...

मुंबईत उद्यापासून रंगणार ‘पार्ले महोत्सव’!

मागील अनेक वर्षांपासून आयोजित होत असलेला मुंबईतील सर्वात मोठा महोत्सव म्हणजे ‘पार्ले महोत्सव’. हा महोत्सव उद्या, २३ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यंदाच्या २३व्या पार्ले महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा व खासदार पूनम महाजन विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील, अशी माहिती महोत्सवाचे प्रमुख आयोजक व विलेपार्ल्याचे आमदार पराग अळवणी यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पार्ले महोत्सवाचे स्वरूप हे विविध स्पर्धांचे आयोजन असे असून, एकूण ३२ प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतील. यातील विविध वयोगट धरून सुमारे ३९२ प्रथम पारितोषिकांसह एकूण २५०० पारितोषिकं बहाल करण्यात येतील. २३ ते ३० डिसेंबर रोजी चालणारा हा महोत्सव विलेपार्लेमधील वामन मंगेश दुभाषी मैदान, पार्ले टिळक विद्यालय व साठ्ये महाविद्यालय तसेच सहार गाव मैदान अशा विविध ठिकाणी संपन्न होईल.

सातत्याने २३ वर्षं आयोजित होत असलेल्या पार्ले महोत्सवातील ३२ प्रकारच्या स्पर्धांमधून सुमारे ३० हजार स्पर्धक भाग घेणार आहेत. या महोस्तवास यशस्वी करण्यासाठी ८००पेक्षा अधिक कार्यकर्ते आहेत. प्रेक्षकांसाठी भव्य स्टेडियम उभारलेल्या वामन मंगेश दुभाषी मैदानास कबड्डी क्षेत्रातील जाणते कार्यकर्ते कै. शंकर मोडक क्रीडा नगरी, कला विभागातील स्पर्धा होत असलेल्या साठ्ये महाविद्यालयास प्रसिद्ध अभिनेते कै. के. डी. चंद्रन नगर तर नृत्यस्पर्धा संपन्न होणाऱ्या पार्ले टिळक शाळा परिसरात ज्येष्ठ व श्रेष्ठ अभिनेत्री चित्रमाऊली कै. सुलोचना दीदी नगर असे नाव देण्यात येणार आहे.

सातत्याने यशस्वीपणे होत असलेल्या या पार्ले महोत्सवाच्या आयोजन समितीच्या कोअर कमिटीमध्ये मिलिंद शिंदे, श्रीकृष्ण आंबेकर, विनीत गोरे, विलास करमळकर, एन. सुरेशन, प्रवीर कपूर, राजेश महेता, अशी मंडळी असून माजी नगरसेविका ज्योती अळवणी, सुनिता मेहता व माजी नगरसेवक अनिष मकवानी व अभिजीत सामंत यांचाही सहभाग आहे.

Continue reading

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...
Skip to content