Homeहेल्थ इज वेल्थदर महिन्याला आजच्या...

दर महिन्याला आजच्या दिवशीच ‘स्वस्थ मन, स्वस्थ घर’ मेळे!

निरोगी जीवनाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या “स्वस्थ मन, स्वस्थ घर” (निरोगी मन निरोगी घर) मोहिमेचा एक भाग म्हणून, दर महिन्याच्या आजच्या दिवशी, म्हणजेच 14 तारखेला देशभरातल्या संपूर्ण 1.56 लाख आयुष्मान भारत – आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

या देशव्यापी आरोग्य मेळ्यांचा एक भाग म्हणून योग, झुंबा, टेलीकन्सल्टेशन (दूरध्वनीवरून वैद्यकीय माहिती देणे), पोषण अभियान, असंसर्गजन्य रोग तपासणी आणि औषध वितरण, सिकलसेल रोगतपासणी यासारखे उपक्रम हाती घेतले जातील. याच अनुषंगाने, 14 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व आयुष्मान भारत आरोग्य केंद्रांमध्ये सायकल जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. यामध्ये सायक्लोथॉन, सायकल रॅली किंवा सायकल फॉर हेल्थ आदी कार्यक्रम होतील. शारीरिक आणि मानसिक स्‍वस्‍थता याच्याशी निगडित विविध विषय तसेच पर्यावरणस्नेही वाहतूक यासंदर्भात यावेळी जागरूकता आणि प्रचार केला जाईल.

आपल्या आरोग्याबाबत जागरूक असणाऱ्यांना तसेच सायकलिंग प्रेमींना कळकळीचे आवाहन करत असताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी सर्व नागरिकांनाही त्यांच्या जवळच्या आयुष्मान भारत आरोग्य केंद्रांमध्ये आयोजित सायकलिंग कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. “आपले शरीर निरोगी, तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी सायकलिंग हा एक उत्तम मार्ग आहे.”, “तुम्हाला वाटेल तितकी लांब किंवा कमीतकमी अंतरापर्यंत सायकल चालवा, पण सायकल नक्की चालवा!”, असे आवाहन डॉ. मांडविया यांनी केले आहे.

“स्वस्थ मन, स्वस्थ घर” (निरोगी मन निरोगी घर) ही नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023पर्यंत वर्षभर चालणारी मोहीम आहे. ही मोहीम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, आरोग्य आणि निरोगी जीवनपद्धतीला प्रोत्साहन देईल. ही मोहीम नवीन राष्ट्रीय आरोग्य धोरण, 2017 याचाच एक भाग आहे. त्यात प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तंदुरुस्ती आणि निरोगी जीवन जगणे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा उद्देश असलेल्या फिट इंडिया मोहीम 2019चा एक भाग म्हणूनही हा उपक्रम काम करेल.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content