Sunday, March 30, 2025
Homeहेल्थ इज वेल्थलठ्ठपणाच्या समस्येवर पंतप्रधान...

लठ्ठपणाच्या समस्येवर पंतप्रधान मोदींना ओमर अब्दुल्लांची साथ!

भारतात वाढत असलेल्या लठ्ठपणाच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेतला असून या कामात त्यांना भारतीय जनता पार्टीचे विरोधक नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची साथ मिळणार आहे.

आकाशवाणीवर रविवारी झालेल्या मन की बात, या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी देशातल्या लठ्ठपणाच्या समस्येकडे भारतवासियांचे लक्ष वेधलं. ही लठ्ठपणाची समस्या सोडवण्यासाठी खाद्यतेलाचा वापर शक्य तितका कमी करावा असे आवाहन त्यांनी केले. हे आवाहन करतानाच त्यांनी या लढाईला बळकटी येण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले. ही जनजागृती करण्यासाठी त्यांनी दहा जणांना नामांकित केले आहे. यामध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याव्यतिरिक्त या मान्यवरांमध्ये अभिनेता निरहुआ, नेमबाज मनु भाकर, वेटलिफ्टर मीराबाई चानू, अभिनेते मोहनलाल, इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलकेणी, अभिनेता माधवन, गायिका श्रेया घोषाल, सुधा मूर्ती यांनाही पंतप्रधानांनी खाद्य तेलाचा वापर कमी करण्याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. या दहा जणांपैकी प्रत्येकाने इतर दहा जणांना नामांकित करावे. त्यांच्यातल्या प्रत्येकाने पुढे दहा-दहा जणांना नामांकित करावे. अशी नामांकनाची एक साखळी तयार होऊन त्या माध्यमातून ही जनजागृती करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान

एक्सवर केलेल्या एका आवाहनात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येशी लढण्याची तातडीची गरज आहे. यासाठी खाद्यतेलाचा वापर कमी करायला हवा. या उद्देशाने एक चळवळ निर्माण करण्याची गरज आहे. या लढ्याला बळकटी देण्यासाठी आणि अन्नातला खाद्यतेलाचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी ही चळवळ जास्तीतजास्त व्यापक व्हायला हवी. एकत्रितपणे आपण भारताला अधिक तंदुरुस्त आणि निरोगी बनवूया. फाईट ओबेसिटी!

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात 57% महिला आणि साधारण 47% पुरुष लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देत आहेl. आपण जे खाद्यतेल वापरतो त्यामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. समोसा, पकोडे, भजी, कचोरी असे तळलेले पदार्थ कटाक्षाने टाळले गेले पाहिजे. हे चवदार तर असतातच पण शरीराला हानिकारकही तितकेच असतात. शरीरामध्ये दिवसभरात खाद्यतेलाचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीला साधारणतः 30 ग्रॅम इतके असायला हवे. याचाच अर्थ चार जणांच्य एका कुटुंबाला महिन्याला एक लिटर खाद्यातेल पुरेसे आहे. पण आज प्रत्यक्षात लोकांकडून दरमहा दहा-दहा लिटर खाद्यतेलाचा वापर होत आहे. हे प्रमाण कमी झाले तर वजन कमी होण्यासही हातभार लागेल आणि त्याकरीताच आता पंतप्रधान मोदी सरसावले आहेत.

Continue reading

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास!

पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा...

कांदा होणार आणखी स्वस्त! निर्यातशुल्क हटवले!!

महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेत या महिन्यापासून कांद्याची आवक वाढली आहे, ज्यामुळे किंमती घसरल्या आहेत. कांदा स्वस्त झाला आहे. 21 मार्च 2025 रोजी लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांद्याचा भाव अनुक्रमे 1330 आणि 1325 रुपये प्रति क्विंटल होता. कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी कांद्याचे रब्बी उत्पादन 227 लाख मेट्रिक...

सचिनभाऊ चषक शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या आमदार सचिनभाऊ अहिर चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. निर्णायक बोर्डपर्यंत पिछाडीवर राहिलेल्या प्रसन्नने अचूक फटकेबाज खेळ करणाऱ्या...
Skip to content