Homeन्यूज अँड व्ह्यूजआता होणार खग्रास...

आता होणार खग्रास सूर्यग्रहणही कृत्रिम!

काय काय कृत्रिम होणार कुणास ठाऊक? बुद्धिमत्ता कृत्रिम झाली. माणसेही कृत्रिम रीतीने तयार होण्याची सुरुवात झाली आहे… आता विज्ञानाचा रोख थेट सूर्यापर्यंत पोहोचला आहे. “सूर्यग्रहणाची वाट कशाला बघायची? आम्ही विज्ञानाची करामत करून केवळ दोन उपग्रह अवकाशात सोडणार आणि सूर्यग्रहण होईल… तेही खग्रास… आता बोला!

आजवर ग्रह सूर्याभोवती फिरायचे आणि त्यामध्ये सूर्य आणि चंद्रग्रहण लागत असे. त्यांच्या तारखा काही वर्षे अगोदरदेखील बघता आणि अगनिताने मांडल्या जाऊ शकत होत्या. आणि त्याही अचूक. मिनिटाचाही फरक नाही. आता विज्ञान म्हणते आहे की, आम्ही सूर्याला कधीही खग्रास ग्रहण लावून जगाच्या विशिष्ट भागात संपूर्ण अंधार करू शकतो. यासाठी विज्ञान संशोधकांनी एक नवी कल्पना आणली आहे. यामध्ये त्यांनी याच वर्षाच्या सुरुवातीला दोन उपग्रह आकाशात सोडले. पृथ्वीबाहेरच्या त्यांच्या भ्रमणकक्षेत त्यांची जागा सूर्याचा प्रकाश अडवला जाऊ शकेल अशी निश्चित केली गेली. हे उपग्रह एकमेकांपासून ४०२ मीटर्स अंतरावर स्थिर केले गेले आणि त्यापैकी एकाने सूर्याचा प्रकाश अडवून ठेवला. या मोहिमेची अचूकता मिलीमीटरच्या परिमाणातील होती हे लक्षात घेतले की, त्यांना आपल्या भ्रमणकक्षेत स्थिर करायला किती गणिते मांडावी लागली असतील याची कल्पना येईल.

ही स्थिती आल्यानंतर बाहेरच्या बाजूला असलेल्या एक उपग्रहाने सूर्याच्या खगोल ग्रहणाची छायाचित्रे घेतली. अशी छायाचित्रे केवळ नैसर्गिक प्रकारचे खग्रास सूर्यग्रहण असतानाच काढली जाऊ शकतात. ‘गूढगर्भी’ असे नाव असलेल्या पहिल्या उपग्रहाने आपल्या ४.६ फुटांच्या ‘डिश’ सूर्यावर सावली पाडून ही करामत केली. या उपक्रमामुळे सूर्यग्रहणाच्या वेळी होत असलेल्या अनेक घटनांची माहिती घेता आली. पृथ्वीवरील काही जागी यावेळी रेडिओ लहरी आणि जीपीएस यंत्रणा बंद झाल्या. साहजिकच या प्रकल्पाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे यश आवडले असेलच यात शंका नाही. “पृथ्वीबाहेरच्या आपल्या भ्रमणकक्षेत उपग्रह इतके कमी अंतर अचूकपणे राखू शकले हे सर्वात मोठे यश होते असे म्हणावे लागेल.” या शब्दात युरोपियन अवकाश संस्थेचे संचालक डिटमार पिट्झ यांनी आनंद व्यक्त केला.

या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, यावेळी उपग्रहांनी दिलेली चित्रे ही नैसर्गिक रीतीने होणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणाइतकीच स्पष्ट आहेत. त्यामुळे आता सूर्याचा अभ्यास करणे काहीसे सोपे झाले आहे. फरक इतकाच आहे की आता खग्रास सूर्यग्रहणाची वाट बघावी लागणार नाही. आम्ही आमचे सूर्यग्रहण १९.६ तासांच्या आमच्या भ्रमणकक्षेत निर्माण करून अभ्यास करू शकतो. या तुलनेत नैसर्गिक सूर्यग्रहणे वर्षातून एकच अथवा दुर्मिळ, फार फार तर दोन होऊ शकतात, हेही समजावून घ्यावे लागेल. सूर्याविना जग चालू शकले नसते इतका तो महत्त्वाचा आणि त्यामुळेच पिता ग्रहगोल आहे. त्याला ग्रहांचा राजा असेदेखील म्हटले जाते. त्याच्या वातावरणाचा अभ्यास करायला मिळाला तर त्या अभ्यासातून पृथ्वीवरच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळावीत अशीच विज्ञानाची आणि सामान्य माणसाचीही इच्छा असणारच. त्यामुळे माणसाने आता सूर्यालाही गवसणी घातली आहे, असेही म्हणता येईल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

लक्षात घ्या.. पाण्याचा जीव गुदमरतोय!

आधुनिक विज्ञान असे सांगते की, ताजे पाणी तसेच प्राणवायू यांचे एक जागतिक जलचक्र असते. जलचक्र अनेकांना नद्या, पाण्याचे प्रवाह, सरोवरे आणि तलाव ही केवळ सृष्टीची सुंदरता दाखवणारे भाग नसून ते पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत हे मान्य केले गेले...

हालचाल अधिक तर मेंदू तल्लख…

आपल्या शरीरातील रक्ताभिसरण आपण घेत असलेला श्वासोच्छवास आणि शरीराची हालचाल यावर अवलंबून असते हे आता सर्वमान्य झाले आहे. त्यासाठी दररोज किती चालावे, किती काळ व्यायाम करावा, किती काळ झोप घेणे आवश्यक आहे इत्यादी गोष्टीही आता बहुतेक सर्वांना परिचित आहेत....

शर्ट किंवा पँटच्या खिशात ठेवू नका मोबाईल!

एकीकडे मोबाईल फोनने क्रांती करायला सुरुवात केली आणि शहरात तर उंच इमारतींवर मोबाईल संवाद चांगला पोहोचावा यासाठी आवश्यक असे मोबाईल टॉवर दिसायला सुरुवात झाली. मोबाईल आले तेव्हाच लोकांच्या मनात त्यामुळे होणारे उत्सर्जन आणि त्याचे दुष्परिणाम यावर चर्चा घडू लागल्या...
Skip to content