Homeहेल्थ इज वेल्थआता थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना...

आता थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना मिळणार गुणवत्तापूर्ण उपचार!

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इको इंडिया (एक्स्टेंशन फॉर कम्युनिटी हेल्थकेअर आऊटकम) यांच्या संयुक्त विद्यमानाने थॅलेसेमिया नियंत्रण आणि हेमोग्लोबिनोपॅथी नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या क्षमतावाढ प्रशिक्षण, कौशल्य विकास मोहीमेला नुकतीच सुरूवात झाली आहे. रक्ताशी संबंधित दुर्मिळ आजाराने ग्रस्त रुग्णांची योग्य काळजी घेता यावी, यासह व्यापक जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर हा पुढाकार घेण्यात आला आहे. पालिकेचे बोरिवलीतील थॅलेसेमिया उपचार केंद्र या मोहीमेसाठी माहिती केंद्र म्हणून कार्यरत आहे. यामुळे थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळू शकतील.

या पुढाकाराबाबत अधिक माहिती देताना पालिकेच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी इको इंडिया यांनी संयुक्त सहभाग घेतला असून शीव रूग्णालयाचे दूरस्थ (सॅटेलाईट) केंद्र असलेली प्रादेशिक प्रशिक्षण संस्था (बोरिवली) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या की, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारीवर्गाची क्षमता, ज्ञान, कौशल्य विकास वाढीसाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण मोहिमेमुळे मुंबईतील थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांची काळजी अधिक चांगल्या रितीने घेणे शक्य होणार आहे. त्यासोबतच रूग्णांना प्राथमिक टप्प्यातच योग्य उपचार मिळतानाच गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होईल. थॅलेसेमिया तसेच रक्ताशी संबंधित दुर्मिळ आजारांनी ग्रस्त रूग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांमधील पोकळी भरुन काढण्यासाठी ही मोहीम उपयुक्त असेल.

पालिकेचे कॉम्प्रेहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर, पेडिएट्रिक हेमॅटोलॉजी ऑन्कॉलॉजी एण्ड बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्राच्या संचालक (शैक्षणिक आणि संशोधन) डॉ. ममता मंगलानी म्हणाल्या की, मुंबईतील थॅलेसेमिया रूग्णांच्या नियमित तपासणीचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तसेच, हेमिओग्लोबिनोपॅथीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यादिशेने इको इंडियासोबतची भागीदारी रक्ताशी संबंधित दुर्मिळ आजारांनी ग्रस्त रूग्णांसाठी उपचार उपलब्धततेकरिता महत्त्वाचे पाऊल आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा पुढाकार अतिशय महत्त्वपूर्ण आहे. थॅलेसेमियाबााबत योग्य शिक्षणाने जनजागृती करा, जागरूक राहा, व्यक्त व्हा आणि काळजी घ्या, हेच यंदाच्या संकल्पनेचे उदिष्ट आहे.

इंडियन अकॅडमी ऑफ पेडिएट्रिक्सचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर म्हणाले की, अनुवांशिक रक्ताच्या आजाराने ग्रस्त रूग्णांना उपचार देण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण, योग्य ज्ञान आणि आवश्यक कौशल्याच्या प्रशिक्षणामुळे रूग्णांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या उपक्रमाला एक वेगळी संधी म्हणून पाहणे गरजेचे आहे.

इको इंडियाचे सहउपाध्यक्ष डॉ. संदीप भल्ला म्हणाले की, मुंबई महापालिकेसोबत इको इंडियाची भागिदारी ही प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने थॅलेसेमिया आणि हेमोग्लोबिनोपॅथीज संसर्ग प्रतिबंध, नियंत्रण आणि रूग्णांना प्रतिकारकक्षमता वाढीसाठी चालना देणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करतानाच त्यांचे ज्ञान आणि कौशल्य विकासालाही चालना मिळणार आहे. परिणामी अनुवांशिक रक्ताचे आजार असणाऱ्या रूग्णांच्या तसेच समुदायाच्या आयुष्यमानावर याचा सकारात्मक परिणाम होण्यासाठी चालना मिळेल.

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content