Homeहेल्थ इज वेल्थसध्यातरी महाराष्ट्र कोरोनाच्या...

सध्यातरी महाराष्ट्र कोरोनाच्या निर्बंधांपासून मुक्त!

कोरोनाविषयक कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याची आवश्यकता आजमितीला नाही, असे राज्य सरकारने आज स्पष्ट केले आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून आतंरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांची थर्मल चाचणी केली जाणार आहे.

सहव्याधी असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत बैठक घेऊन करोनाविषयक केंद्र सरकारचे निर्देश आणि सद्यस्थिती यांचा आढावा घेतला. 

बीएफ.७ या करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या नव्या प्रकाराचे देशात केवळ चार रुग्ण असून दोन गुजरात तर दोन रुग्ण ओरिसात आढळलेले आहेत. महाराष्ट्रात त्याचा एकही रुग्ण नाही. तरीही पूर्वकाळजी म्हणून आपण ज्येष्ठ नागरिक विशेषतः सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक यांना सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी परिधान करण्याचे आवाहन करत आहोत. कारण तसे करणे सार्वजनिक हिताचे आहे, असेही त्यांनी सांगितले. 

कोरोना

यानंतरच्या काळात परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. महाराष्ट्राच्या जनतेने काळजी न करता कोरोनाबद्दल सावधानता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले. मागील आठवड्यात राज्यातली कोविड रुग्णसंख्या पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे. कोविड चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण सध्या .29 इतके आहे. संसर्ग होऊन रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस घटत आहे. मागच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात फक्त 16 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. 22 डिसेंबरच्या म्हणजेच आजच्या अहवालानुसार राज्यात एकूण 134 क्रियाशील रुग्ण आहेत. मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशात उफाळून आलेला कोरोना लक्षात घेता सावधानता बाळगण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत असे ते म्हणाले.

भीती नको पण काळजी घ्या, मास्कसक्ती नाही पण वरिष्ठ नागरिक आणि अति जोखमीचा आजार असणाऱ्या व्यक्तींनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. सर्व जिल्ह्यांनी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, व्हॅक्सिनेट आणि कोविडअनुरूप वर्तणूक या पंचसूत्रीचा वापर करावा. प्रयोगशाळेत चाचण्या वाढवण्यावर भर द्यावा. आयटीपीसीआर चाचणीवर भर देण्यात यावा. शंभर टक्के जनुकीय क्रम निर्धारण तपासणी करण्यात यावी. कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि प्रिकॉशन डोस यावर भर देण्यात यावा. रुग्णालयीन व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात यावी. मनुष्यबळ प्रशिक्षण तसेच क्षमता तयार करावी. आंतरराष्ट्रीय प्रवासांचे थर्मल स्क्रीनिंग करावे. राज्य टास्क फोर्स स्थापन करावा असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content