Homeहेल्थ इज वेल्थसध्यातरी महाराष्ट्र कोरोनाच्या...

सध्यातरी महाराष्ट्र कोरोनाच्या निर्बंधांपासून मुक्त!

कोरोनाविषयक कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याची आवश्यकता आजमितीला नाही, असे राज्य सरकारने आज स्पष्ट केले आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून आतंरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांची थर्मल चाचणी केली जाणार आहे.

सहव्याधी असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत बैठक घेऊन करोनाविषयक केंद्र सरकारचे निर्देश आणि सद्यस्थिती यांचा आढावा घेतला. 

बीएफ.७ या करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या नव्या प्रकाराचे देशात केवळ चार रुग्ण असून दोन गुजरात तर दोन रुग्ण ओरिसात आढळलेले आहेत. महाराष्ट्रात त्याचा एकही रुग्ण नाही. तरीही पूर्वकाळजी म्हणून आपण ज्येष्ठ नागरिक विशेषतः सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक यांना सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी परिधान करण्याचे आवाहन करत आहोत. कारण तसे करणे सार्वजनिक हिताचे आहे, असेही त्यांनी सांगितले. 

कोरोना

यानंतरच्या काळात परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. महाराष्ट्राच्या जनतेने काळजी न करता कोरोनाबद्दल सावधानता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले. मागील आठवड्यात राज्यातली कोविड रुग्णसंख्या पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे. कोविड चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण सध्या .29 इतके आहे. संसर्ग होऊन रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस घटत आहे. मागच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात फक्त 16 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. 22 डिसेंबरच्या म्हणजेच आजच्या अहवालानुसार राज्यात एकूण 134 क्रियाशील रुग्ण आहेत. मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशात उफाळून आलेला कोरोना लक्षात घेता सावधानता बाळगण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत असे ते म्हणाले.

भीती नको पण काळजी घ्या, मास्कसक्ती नाही पण वरिष्ठ नागरिक आणि अति जोखमीचा आजार असणाऱ्या व्यक्तींनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. सर्व जिल्ह्यांनी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, व्हॅक्सिनेट आणि कोविडअनुरूप वर्तणूक या पंचसूत्रीचा वापर करावा. प्रयोगशाळेत चाचण्या वाढवण्यावर भर द्यावा. आयटीपीसीआर चाचणीवर भर देण्यात यावा. शंभर टक्के जनुकीय क्रम निर्धारण तपासणी करण्यात यावी. कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि प्रिकॉशन डोस यावर भर देण्यात यावा. रुग्णालयीन व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात यावी. मनुष्यबळ प्रशिक्षण तसेच क्षमता तयार करावी. आंतरराष्ट्रीय प्रवासांचे थर्मल स्क्रीनिंग करावे. राज्य टास्क फोर्स स्थापन करावा असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content