Homeपब्लिक फिगरवृक्षलागवडीच्या चौकशी समितीत...

वृक्षलागवडीच्या चौकशी समितीत नितेश राणे!

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत केली. भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. येत्या चार महिन्यांत ही समिती आपला अहवाल सभागृहाला सादर करेल.

२०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन फडणवीस सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहिम राबविली होती. त्यावर किती खर्च झाला व यातील किती झाडांचे संगोपन झाले यासंदर्भात शिवसेनेचे भांडूपचे आमदार रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या मोहिमेअंतर्गत वन विभागाने २८ कोटी वृक्षांची लागवड केली. त्यातील सध्या ७५ टक्के रोपे जिवंत असून २५ टक्के रोपे नष्ट झाल्याचे सरकारने विधानसभेत मान्य केले होते. राज्यातील अनेक भागातील वृक्ष नष्ट झाले असून, जी झाडे आहेत त्याची व्यवस्थित देखभाल व संगोपन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. वृक्ष लागवड मोहिमेवर २५०० कोटी रुपये खर्च करूनही झाडे जळत असतील तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आमदारांनी केली. त्यावर भरणे यांनी विधिमंडळाच्या समितीमार्फत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

चार किंवा सहा महिन्यात याचा अहवाल सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी सभागृहाला दिली होती. त्यानुसार, आता भरणे यांनी विधिमंडळ सदस्यांची समिती स्थापन करून ही समिती चार महिन्यांच्या आत सभागृहाला अहवाल सादर करेल, अशी घोषणा केली.

अशी आहे सर्वपक्षीय १६ आमदारांची समिती

दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत पुढील सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सुनील प्रभू, उदयसिंग राजपूत, बालाजी किणीवर (सर्व शिवसेना), अशोक पवार, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, शेखर निकम (सर्व राष्ट्रवादी), नाना पटोले, सुभाष धोटे,  अमित झनक, संग्राम थोपटे (सर्व काँग्रेस), आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातखळकर, समीर कुणावर (सर्व भारतीय जनता पार्टी) आणि नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) यांचा समावेश आहे.

Continue reading

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...

लाभ घ्या आयुष्मान भारत आणि म. फुले जनआरोग्य योजनेचा

महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातल्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड राज्यातल्या आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानचालक यांच्यामार्फत तयार केले...

एमआयजी क्रिकेट क्लबची राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबईतल्या एमआयजी क्रिकेट क्लबच्या वतीने तिसरी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा येत्या 27 ते 29 सप्टेंबर 2025दरम्यान एमआयजी क्रिकेट क्लब, कलानगर वांद्रे (पाश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात खेळविण्यात येणाऱ्या या...
Skip to content