Homeचिट चॅटनितेश राणेंकडून ‘मातोश्री’च्या...

नितेश राणेंकडून ‘मातोश्री’च्या अंगणातच सेनेला दणका!

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी शिवसेनेला मातोश्रीच्या अंगणातच दणका दिला.

शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी काल असंख्य शिवसैनिकांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशासाठी आमदार नितेश राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या पक्षप्रवेशावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, पक्षाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर, मयूर बागेरीया उपस्थित होते.

शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती यांनी पतीच्या निधनानंतर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून पोटनिवडणूक लढविली व जिंकली होती. तेव्हा काँग्रेसकडून निवडणूक लढविणारे नारायण राणे यांचा त्यांनी पराभव केला होता. मात्र, नंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली. परिणामी तृप्ती सावंत अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उभ्या ठाकल्या आणि तेथे शिवसेनेला आपली जागा गमवावी लागली. काँग्रेसचे झिशान सिद्दिकी तेथून विजयी झाले.

आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नात आमदार नितेश राणे यांनी तृप्ती सावंत यांनाच भाजपात आणले. सावंत यांच्या पक्षप्रवेशानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले. त्यात त्यांनी या पक्षप्रवेशाचा उल्लेख ‘बेगडी हिंदुत्वाकडून भगव्या हिंदुत्वाकडे!’, असा टोला शिवसेनेला लगावला.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content