Homeचिट चॅटनितेश राणेंकडून ‘मातोश्री’च्या...

नितेश राणेंकडून ‘मातोश्री’च्या अंगणातच सेनेला दणका!

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी शिवसेनेला मातोश्रीच्या अंगणातच दणका दिला.

शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी काल असंख्य शिवसैनिकांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशासाठी आमदार नितेश राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या पक्षप्रवेशावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, पक्षाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर, मयूर बागेरीया उपस्थित होते.

शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती यांनी पतीच्या निधनानंतर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून पोटनिवडणूक लढविली व जिंकली होती. तेव्हा काँग्रेसकडून निवडणूक लढविणारे नारायण राणे यांचा त्यांनी पराभव केला होता. मात्र, नंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली. परिणामी तृप्ती सावंत अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उभ्या ठाकल्या आणि तेथे शिवसेनेला आपली जागा गमवावी लागली. काँग्रेसचे झिशान सिद्दिकी तेथून विजयी झाले.

आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नात आमदार नितेश राणे यांनी तृप्ती सावंत यांनाच भाजपात आणले. सावंत यांच्या पक्षप्रवेशानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले. त्यात त्यांनी या पक्षप्रवेशाचा उल्लेख ‘बेगडी हिंदुत्वाकडून भगव्या हिंदुत्वाकडे!’, असा टोला शिवसेनेला लगावला.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content