Tuesday, February 4, 2025
Homeचिट चॅटनितेश राणेंकडून ‘मातोश्री’च्या...

नितेश राणेंकडून ‘मातोश्री’च्या अंगणातच सेनेला दणका!

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी शिवसेनेला मातोश्रीच्या अंगणातच दणका दिला.

शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी काल असंख्य शिवसैनिकांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशासाठी आमदार नितेश राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या पक्षप्रवेशावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, पक्षाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर, मयूर बागेरीया उपस्थित होते.

शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती यांनी पतीच्या निधनानंतर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून पोटनिवडणूक लढविली व जिंकली होती. तेव्हा काँग्रेसकडून निवडणूक लढविणारे नारायण राणे यांचा त्यांनी पराभव केला होता. मात्र, नंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली. परिणामी तृप्ती सावंत अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उभ्या ठाकल्या आणि तेथे शिवसेनेला आपली जागा गमवावी लागली. काँग्रेसचे झिशान सिद्दिकी तेथून विजयी झाले.

आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नात आमदार नितेश राणे यांनी तृप्ती सावंत यांनाच भाजपात आणले. सावंत यांच्या पक्षप्रवेशानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले. त्यात त्यांनी या पक्षप्रवेशाचा उल्लेख ‘बेगडी हिंदुत्वाकडून भगव्या हिंदुत्वाकडे!’, असा टोला शिवसेनेला लगावला.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content