Homeन्यूज ॲट अ ग्लांसपॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला रौप्यपदक!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्णपदकाची आशा असलेला भालाफेकपटू नीरज चौप्रा याने आज मध्यरात्रीनंतर झालेल्या फायनलमध्ये तमाम भारतीयांची निराशा केली. ८९.४५ मीटर लांब भाला फेकून त्याने रौप्यपदक पटकावले. मात्र सुवर्णपदकाने त्याला हुलकावणी दिली. पाकिस्तानचा अर्षद नदीम याने ९२.९७ मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटर लांब भाला फेकत कांस्यपदक मिळवले.

ऑलिम्पिक

फायनलमध्ये नीरज चोप्राला आज सूरच लागत नव्हता. पहिल्या प्रयत्नातच त्याचा फाऊल झाला. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात तो सावरला आणि त्याने ८९.४५ मीटर दूर भाला फेकत आपले रौप्यपदक निश्चित केले. पाकिस्तानच्या अर्षदने मात्र पहिल्याच प्रयत्नात ९२.९७ मीटर भाला फेकत आपले वर्चस्व दाखवून दिले. त्याला मात देण्याच्या प्रयत्नात नीरजने नंतर चार प्रयत्न केले. मात्र यातल्या एकाही प्रयत्नात त्याला यश आले नाही. त्याचे सर्व प्रयत्न फाऊल झाले. अर्षदनेही आपला हा रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न केला. पण तो फक्त एकदाच ९० मीटरच्या पुढे गेला. उरलेल्या वेळी एकदा त्याचा फाऊल झाला तर इतर वेळी त्याला ८८, ८९ मीटरपर्यंतच जाता आले.

गेल्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने याच प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content