Homeन्यूज ॲट अ ग्लांसपॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला रौप्यपदक!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्णपदकाची आशा असलेला भालाफेकपटू नीरज चौप्रा याने आज मध्यरात्रीनंतर झालेल्या फायनलमध्ये तमाम भारतीयांची निराशा केली. ८९.४५ मीटर लांब भाला फेकून त्याने रौप्यपदक पटकावले. मात्र सुवर्णपदकाने त्याला हुलकावणी दिली. पाकिस्तानचा अर्षद नदीम याने ९२.९७ मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटर लांब भाला फेकत कांस्यपदक मिळवले.

ऑलिम्पिक

फायनलमध्ये नीरज चोप्राला आज सूरच लागत नव्हता. पहिल्या प्रयत्नातच त्याचा फाऊल झाला. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात तो सावरला आणि त्याने ८९.४५ मीटर दूर भाला फेकत आपले रौप्यपदक निश्चित केले. पाकिस्तानच्या अर्षदने मात्र पहिल्याच प्रयत्नात ९२.९७ मीटर भाला फेकत आपले वर्चस्व दाखवून दिले. त्याला मात देण्याच्या प्रयत्नात नीरजने नंतर चार प्रयत्न केले. मात्र यातल्या एकाही प्रयत्नात त्याला यश आले नाही. त्याचे सर्व प्रयत्न फाऊल झाले. अर्षदनेही आपला हा रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न केला. पण तो फक्त एकदाच ९० मीटरच्या पुढे गेला. उरलेल्या वेळी एकदा त्याचा फाऊल झाला तर इतर वेळी त्याला ८८, ८९ मीटरपर्यंतच जाता आले.

गेल्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने याच प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content