Tuesday, February 4, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसपॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला रौप्यपदक!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्णपदकाची आशा असलेला भालाफेकपटू नीरज चौप्रा याने आज मध्यरात्रीनंतर झालेल्या फायनलमध्ये तमाम भारतीयांची निराशा केली. ८९.४५ मीटर लांब भाला फेकून त्याने रौप्यपदक पटकावले. मात्र सुवर्णपदकाने त्याला हुलकावणी दिली. पाकिस्तानचा अर्षद नदीम याने ९२.९७ मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटर लांब भाला फेकत कांस्यपदक मिळवले.

ऑलिम्पिक

फायनलमध्ये नीरज चोप्राला आज सूरच लागत नव्हता. पहिल्या प्रयत्नातच त्याचा फाऊल झाला. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात तो सावरला आणि त्याने ८९.४५ मीटर दूर भाला फेकत आपले रौप्यपदक निश्चित केले. पाकिस्तानच्या अर्षदने मात्र पहिल्याच प्रयत्नात ९२.९७ मीटर भाला फेकत आपले वर्चस्व दाखवून दिले. त्याला मात देण्याच्या प्रयत्नात नीरजने नंतर चार प्रयत्न केले. मात्र यातल्या एकाही प्रयत्नात त्याला यश आले नाही. त्याचे सर्व प्रयत्न फाऊल झाले. अर्षदनेही आपला हा रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न केला. पण तो फक्त एकदाच ९० मीटरच्या पुढे गेला. उरलेल्या वेळी एकदा त्याचा फाऊल झाला तर इतर वेळी त्याला ८८, ८९ मीटरपर्यंतच जाता आले.

गेल्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने याच प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content