Homeकल्चर +संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी...

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.

सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पद्धतीने झाली. केंद्राच्या वतीने जाहीर केलेल्या पुरस्कारांची घोषणा आधीच झाली होती. पण प्रत्यक्ष वितरणाच्या वेळी मानकऱ्यांना सन्मानित करताना भावूक क्षण अनुभवायला मिळाले. संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार के. सीता राममोहन राव यांना त्यांच्या दीर्घकालीन संगीत शिक्षणातील योगदानाबद्दल हा सन्मान मिळाला. त्यांनी त्यांचा गौरव

करताना भावूक होऊन काही आठवणी सांगितल्या. संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत पुरस्कार जयश्री पाटणेकर यांना देण्यात आला. त्यांच्या मनोगताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांचे नाट्य दिग्दर्शनातील कौशल्य ओळखून त्यांना सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे यांना त्यांच्या रंगभूमीवरील दीर्घ प्रवासासाठी पुरस्कार मिळाला.

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री ईशा डे यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षक मनमुराद हसले आणि त्यांना हा पुरस्कार मिळताना आनंद व्यक्त केला. याशिवाय, डॉ. नीती बडवे यांच्या ‘मुशाफिरी’ या पुस्तकाला उत्कृष्ट प्रवासवर्णनासाठी पुरस्कार देण्यात आला. संगीतक्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री तन्वी गोरे यांचाही सन्मान झाला. संगीत विशारद परीक्षेत मुंबई विभागातून प्रथम आलेल्या सौम्या क्षीरसागर आणि रोहन देशमुख यांना ताराबाई दीक्षित पुरस्काराने गौरवण्यात आले. कार्यक्रमात मानकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेकांनी आपल्या गुरूंचे, सहकाऱ्यांचे आणि कुटुंबियांचे आभार मानले. केंद्राच्या वतीने अधिकाधिक रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार सभागृह रसिकांनी खचाखच भरले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....

17 मार्चला मुंबईत टपाल पेन्शन अदालत

मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांनी टपाल विभागातल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंब वेतनधारकांसाठी येत्या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि...
Skip to content