एका वर्षात 21 लाखांहून जास्त फसवे दूरध्वनी क्रमांक उघडकीस

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे (ट्राय) देशभरात एका वर्षात 21 लाखांहून अधिक फसवे दूरध्वनी क्रमांक उघडकीस आणण्यात आले असून याप्रकरणी एक लाखाहून अधिक संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. फसव्या दूरध्वनी क्रमांकांमुळे भरडल्या जाणाऱ्या ग्राहकांनी फसवणाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक केवळ ब्लॉक न करता TRAI DND ॲपद्वारे स्पॅम आणि फसवणुकीसंबंधीच्या तक्रारी नोंदवण्याचे आवाहन ट्रायने सर्व मोबाईल वापरकर्त्यांना केले आहे.

नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारींवरून कारवाई करत ट्रायने गेल्या वर्षभरात 21 लाखांहून अधिक मोबाईल क्रमांक आणि स्पॅम तसेच फसवे संदेश पाठवण्यात सहभागी असलेल्या सुमारे एक लाख संस्थांचे क्रमांक खंडित केले आहेत. हे क्रमांक काळ्या यादीत टाकण्यात आले आहेत. देशभरातील दूरसंचार सुविधेचा गैरवापर रोखण्यात वापरकर्त्यांकडून दाखल केल्या जाणाऱ्या सामूहिक तक्रारींची महत्त्वाची भूमिका असल्याचे यावरून दिसून येत आहे. नागरिकांनी अधिकृत TRAI DND ॲपद्वारे स्पॅमची तक्रार केल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करणे शक्य झाल्याचे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे.

जेव्हा एखाद्या वापरकर्त्याकडून TRAI DND अ‍ॅपवर स्पॅम कॉल किंवा एसएमएसची तक्रार नोंदवली जाते, तेव्हा ते प्राधिकरणाला आणि दूरसंचार सेवा पुरवठादारांना संबंधित मोबाइल क्रमांक ट्रॅक करण्याची, त्याची पडताळणी करण्याची आणि ते कायमचे खंडित करण्याची मुभा मिळते. याउलट, तुमच्या फोनवर असे क्रमांक ब्लॉक केल्यास तो क्रमांक फक्त तुमच्या वैयक्तिक फोनवर लपवला जातो. त्यामुळे फसवणूक करणाऱ्याला नवीन क्रमांकाचा वापर करून इतरांशी संपर्क साधण्यापासून रोखले जात नाही, असेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

दूरध्वनी

नागरिकांसाठी सूचना:

१. अधिकृत ॲप स्टोअर्सवरून TRAI DND ॲप डाउनलोड करा.

२. गुन्हेगारांची ओळख पटवणे शक्य व्हावे तसेच त्यांचे क्रमांक खंडित करण्यास मदत म्हणून त्यांचे क्रमांक आपल्या फोनवर ब्लॉक करण्याऐवजी TRAI DND अ‍ॅपच्या मदतीने स्पॅम एसएमएस/कॉल्सची तक्रार नोंदवा.

३. दूरध्वनी कॉल, मेसेज किंवा समाज माध्यमावरून वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील शेअर करणे टाळा.

४. तुम्हाला धमकी देणारा किंवा संशयास्पद कॉल आल्यास तो ताबडतोब डिस्कनेक्ट करा.

५. सायबर फसवणुकीची तक्रार 1930 या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in वर दाखल करा.

६. दूरसंचार संसाधनांचा गैरवापर करून फसवणुकीचा प्रयत्न झाल्याची तक्रार संचार साथीच्या “चक्षू” या फीचरद्वारे नोंदवा.

ट्रायने सर्व नागरिकांना, खासकरून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि डिजिटल तंत्राच्या नवख्या किंवा कमी अनुभव असलेल्या वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचे, ही सूचना सामायिक करण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद संदेशांची त्वरित तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content