Homeचिट चॅटमहाराष्ट्र काँग्रेसच्या मीडिया...

महाराष्ट्र काँग्रेसच्या मीडिया विभागाला राष्ट्रीय ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार प्रदान!

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाला सर्वात वेगवान आणि तपशीलवार अपडेट आणि बातम्या माध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांच्या श्रेणीमध्ये प्रभासाक्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोमवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित विचार संगम या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

’प्रभासाक्षी’ समूहाद्वारे द्वारे देशभरातील राजकीय पक्षांच्या माध्यम विभागाच्या कामकाजाचे सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षीच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाने वेगवान आणि तपशीलवार अपडेट्स तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू अशा विविध भाषांमध्ये वेळेत आणि नेमकी माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात देशात प्रथम क्रमांक मिळवल्याने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये आयोजित ‘प्रभासाक्षी’च्या २२ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात IAAN समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.अनुज गर्ग व निस्कॉर्ट मिडिया इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य डॉ. रितु दुबे-तिवारी व प्रभासाक्षीचे मुख्य संपादक निरज दुबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

श्रीनिवास बिक्कड

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या पुरस्काराबद्दल मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांच्यासह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. सद्याच्या परिस्थितीत मीडिया विभागाचे काम अत्यंत महत्वाचे आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा खा. सोनियाजी गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खर्गे आणि आमचे नेते राहुलजी गांधी यांचे विचार आणि भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेसचा मीडिया विभाग करत आहे असे पटोले म्हणाले.

नाना पटोले

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा माध्यम विभाग काम करत असून त्यांनी आखून दिलेल्या रणनितीनुसार काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माध्यम विभाग काम करत आहे. विभागाच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून देशभरातील प्रथम पुरस्कार मिळाला आहे ही अत्यंत आनंदाची बाब असून विभागाच्या कार्याला बळ देणारी असे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

Continue reading

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...
Skip to content