Homeचिट चॅटरायगडमधल्या कुणबी जोडो...

रायगडमधल्या कुणबी जोडो अभियानाला जोरदार प्रतिसाद

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 75 वर्षे होऊनही कोकणातील कुणबी समाज उपेक्षितच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी तसेच समाज संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने कुणबी समाजोन्नती संघातर्फे रविवारपासून रायगड जिल्ह्यात कुणबी जोडो अभियान छेडण्यात आले आहे.

डिसेंबर 2022मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कोकणातील कुणबी जोडो अभियानाची सुरुवात झाली. मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघ या शतकोत्तरी वाटचाल केलेल्या मातृसंस्थेच्या वतीने, 8 जानेवारी रोजी महाड पोलादपूर तालुक्यातील बारा ते पंधरा हजार कुणबी समाजबांधव एकत्र आले होते. महाड तालुक्यातील पाचाड गावी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली काढली गेली. लोकनेते माजी आमदार शांताराम फिलसे यांच्या जन्मभूमी चिंभावे गावी तालुकास्तरीय कुणबी जोडो अभियान रॅलीचा समारोप झाला.

कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांच्या प्रमुख नेतृत्त्वाखाली, कुणबी राजकीय संघटन समिती अध्यक्ष अशोक वालम यांच्या प्रयत्नातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, पालघर, मुंबई नवी मुंबई, मुंबई उपनगर क्षेत्रात कुणबी जोडो अभियान राबविले जात आहे. महाड-पोलादपूर तालुकाध्यक्ष अनंत गवळकर यांच्या पुढाकाराने 8 जानेवारी रोजी तालुक्यातील 9 गट आणि हजारोंच्या संख्येने कुणबी समाज बांधव-भगिनी अभियानात सहभागी झाले. कुणबी समाजोन्नती मंडळ महाड-पोलादपूर मध्यवर्ती अध्यक्ष प्रदीप लोखंडे, सरचिटणीस प्रकाश तरळ, कोषाध्यक्ष संभाजी काजरेकर, कुणबी युवा संघाचे सहसचिव मिलिंद चिबडे आदींनी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कुणबी समाजोन्नती संघातर्फे रायगड़ ज़िल्ह्यातील सर्व तालुका शाखांच्या कुणबी जोडो अभियानाचा कार्यक्रम 15 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. पुढील कार्यक्रम असा: 10 जानेवारी- म्हसळा, 11 जानेवारी- श्रीवर्धन, 12 जानेवारी- तळा, 13 जानेवारी-  रोहा, 14 जानेवारी- मुरुड, अलिबाग, 15 जानेवारी- पेण, उरण, कर्जत, खालापूर, पाली आणि संध्याकाळी पनवेल येथे समारोप.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content