Homeचिट चॅटकोमसाप दादरचा मराठी भाषा...

कोमसाप दादरचा मराठी भाषा पंधरवडा संपन्न

अनुयोग विद्यालय, खार व कोकण मराठी साहित्य परिषद, दादर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने बाल साहित्यावरील कार्यक्रमाचे आयोजन मुंबई अनुयोग विद्यालय, जवाहर नगर, खार (पूर्व) येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य सतिशचंद्र (भाई) चिंदरकर, संस्थापक, अनुयोग विद्यालय  यांनी भूषविले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून कोमसापच्या मुंबई जिल्हा प्रतिनिधी फरझाना इक्बाल उपस्थित होत्या. तसेच दादर शाखा अध्यक्षा विद्याताई प्रभू, कार्यवाह मनोज धुरंधर, ज्येष्ठ सभासद अशोक मोहिले व अनुयोग शाळेचे मुख्याध्यापक परब यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे निवेदन दादर शाखा कोषाध्यक्ष समीर बने यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले.

सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तदनंतर अनुयोग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत मुलांनीच हस्तकलेने बनविलेल्या कागदी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमात प्रथम अनुयोग विद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांनी आपल्या कवितांचे छान सादरीकरण केले. तदनंतर कोमसाप शाखांच्या पदाधिकाऱ्यांपैकी विलेपार्ले शाखेचे अध्यक्ष संतोष खाडे, बोरिवली शाखेचे विजय तारी, दादर शाखेचे अशोक मोहिले यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले.

मान्यवरांपैकी प्रमुख पाहुण्या कवयित्री फरझाना इक्बाल यांनी मुलांना काव्यासंदर्भात व प्रसंगानुरूप कविता कशी लिहावी याचे मार्गदर्शन केले व आपली “खारुताई” या कवितेचे सादरीकरण केले. ते मुलांना खूप आवडले. तदनंतर दादर शाखा कार्यवाह मनोज धुरंधर यांनी मराठी भाषा आणि तिची महती सांगणाऱ्या महापुरूषांवरील एक सुंदर गीत गायले. मुलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

नंतर दादर शाखा अध्यक्षा विद्या प्रभू यांनी सर्वप्रथम मुलांना शाळेसाठी, शिक्षकांसाठी टाळ्या वाजवायला सांगितले. अनुयोग विद्यालयामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात ही फार मोलाची संधी आहे असे प्रतिपादन केले. शाळेत जे साहित्यिक, सांस्कृतिक, संस्कारक्षम असे वातावरण आहे हे तुमच्या जडणघडणीसाठी मौलिक, उपयुक्त असे आहे. कदाचित आज याचे मोल तुम्हाला कमी वाटत असेल. पण भविष्यात तुम्हाला अभिमान वाटेल की आपण अनुयोगचे विद्यार्थी आहोत.

पुढे त्यांनी महात्मा गांधीजींच्या शिष्याची ‘नेहमी खरे का बोलावे’ ही गोष्ट सांगितली. यात आपल्या खरे बोलण्याने खोटे बोलणाऱ्यांची संख्या एकाने कमी होईल व स्वत:बद्दल अभिमानाची भावना वाढेल की मी नेहमी खरं बोलतो. नंतर ‘चिमणीची गोष्ट ‘सांगितली. यातून साने गुरुजींच्या जगाला प्रेम अर्पावे या भावनेची, संदेशाची आज गरज आहे हा प्रेमाचा संदेश देऊन आपलं छोटेखानी भाषण संपवलं.

शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश चिंदरकर सरांनी मुलांना जुन्या सेवा दलाच्या, साने गुरुजींच्या व आपल्याला कविता गोडी लावणाऱ्या त्यांच्या शिक्षकांच्या हृद्य आठवणी सांगितल्या. मुले खूप भावूक होऊन सारं ऐकत होती. त्यांनी आपल्या बालपणीच्या काही कविता ही सादर केल्या. निवेदक कवी समीर बने यांनी सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित शाखांच्या अध्यक्ष, पदाधिकारी सभासद व अनुयोगच्या सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.

Continue reading

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले. या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात...
Skip to content