Homeडेली पल्समंगला अडसूळ स्मृती...

मंगला अडसूळ स्मृती बुद्धीबळ स्पर्धेला सुरूवात

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिनानिमित्त सुरू झालेल्या मंगला अडसूळ स्मृती चषक ८/१०/१२ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या बुद्धीबळ स्पर्धेत आरव जतानिया, समीर नाडकर्णी, अनंत काब्रा, आस्य चव्हाण, खुश मोकारीया, मल्हार कोटे आदींनी विजयी दौड केली.

मुंबई बुद्धीबळ असोसिएशन मान्यतेच्या स्पर्धेत मुंबई शहर-उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील ६४ सबज्युनियर खेळाडूंमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन को-ऑपरेटीव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबईचे अध्यक्ष व माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते झाले.

मंगला अडसूळ स्मृती ८ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत आरव जतानियाने मितांश टोलीयाच्या राजाला १६व्या चालीअखेर नमविले. समीर नाडकर्णीने अक्षय काब्राला तर अनंत काब्राने समीर थोरातला पराभूत केले. १२ वर्षांखालील गटात आस्य चव्हाणने जश मोकारीयावर, खुश मोकारीयाने अब्दुल हादीवर तर मल्हार कोटेने आदित्य पालकरवर विजय मिळवून सलामीचा पहिला साखळी गुण वसूल केला.

उदघाटनप्रसंगी को-ऑप. बँक एम्पलॉईज युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, हशम धामस्कर, प्रकाश वाघमारे, भार्गव धारगळकर, जनार्दन मोरे, अशोक नवले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content