Homeकल्चर +महाराष्ट्र राज्य हौशी...

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी आजपासून

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ची अंतिम फेरी मुंबईतल्या वांद्र्याच्या रंगशारदा नाट्यगृहात आजपासून सुरू होत आहे. येत्या १५ मार्चपर्यंत या फेरीतल्या स्पर्धा चालणार असून त्यात रसिकांसाठी ४५ नाटकांची मेजवानी असेल. या नाटकांचा आनंद लुटण्यासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. विनामूल्य प्रवेशिका श्री शिवाजी मंदीर, दादर येथे उपलब्ध आहेत.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील २३ केंद्रांवर आणि गोवा अशा एकूण २४ केंद्रांवर राज्य नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली होती. राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम व द्वितीय पारितोषिकप्राप्त दर्जेदार नाटकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. अंतिम फेरीतील पहिले नाटक ‘पंचमवेद’ आज सायंकाळी ७.०० वाजता सादर होणार आहे. यानंतर दररोज सकाळी ११.३० वा. आणि सायंकाळी ७.०० वाजता नाटकांचे प्रयोग सादर होतील. या अंतिम फेरीमध्ये १२००हून अधिक हौशी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील स्पर्धक संघांचे मनोधैर्य वाढवण्याकरीता, त्यांना शुभेच्छा देण्याकरीता आणि विविध विषयांवरची विविध अंगी नाटके पाहण्याकरिता जास्तीतजास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content