Homeकल्चर +महाराष्ट्र राज्य हौशी...

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी आजपासून

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ची अंतिम फेरी मुंबईतल्या वांद्र्याच्या रंगशारदा नाट्यगृहात आजपासून सुरू होत आहे. येत्या १५ मार्चपर्यंत या फेरीतल्या स्पर्धा चालणार असून त्यात रसिकांसाठी ४५ नाटकांची मेजवानी असेल. या नाटकांचा आनंद लुटण्यासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. विनामूल्य प्रवेशिका श्री शिवाजी मंदीर, दादर येथे उपलब्ध आहेत.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील २३ केंद्रांवर आणि गोवा अशा एकूण २४ केंद्रांवर राज्य नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली होती. राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम व द्वितीय पारितोषिकप्राप्त दर्जेदार नाटकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. अंतिम फेरीतील पहिले नाटक ‘पंचमवेद’ आज सायंकाळी ७.०० वाजता सादर होणार आहे. यानंतर दररोज सकाळी ११.३० वा. आणि सायंकाळी ७.०० वाजता नाटकांचे प्रयोग सादर होतील. या अंतिम फेरीमध्ये १२००हून अधिक हौशी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील स्पर्धक संघांचे मनोधैर्य वाढवण्याकरीता, त्यांना शुभेच्छा देण्याकरीता आणि विविध विषयांवरची विविध अंगी नाटके पाहण्याकरिता जास्तीतजास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content