Homeबॅक पेजगोरेगावात रंगणार महामुंबई...

गोरेगावात रंगणार महामुंबई कबड्डी प्रीमियर लीग – पर्व ३

मुंबईतील अभिनव कला क्रीडा अकॅडमी, अभिनव क्रीडा मंडळ-गोरेगाव, एकता क्रीडा मंडळ-वडगाव, मुंबई आणि महामुंबई कबड्डी फाऊंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच, राष्ट्रीय प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय स्पर्धा आयोजक, क्रीडा संघटक, समाजसेवक अंकुश रामचंद्र मोरे यांच्या एकसष्टीनिमित्त तिसऱ्या जिल्हास्तरीय ‘महामुंबई कबड्डी लीग’ (एमएमकेएल) या स्पर्धेचे आयोजन येत्या २६ एप्रिल ते ३ मे २०२५ या कालावधीत होणार आहे.

या स्पर्धेत उपनगरातील अव्वल खेळाडूंचा समावेश आहे. या दर्जेदार स्पर्धेला अर्थातच मुंबई उपनगर कबड्डी संघटनेची मान्यता आहे. सध्या कबड्डी या खेळाला एका आगळे वेगळे वलय प्राप्त झाले आहे. अस्सल देशी आणि मराठी मातीतील या खेळाला, तो व्यावसायिक स्तरावर खेळला जाऊ लागल्याने प्रचंड लोकप्रियता मिळू लागली आहे. याला अर्थात प्रो-कबड्डी कारणीभूत आहे. हे लक्षात घेता हा खेळ आजच्या युवा पिढीला साद घालत आहे, हे आपण अनुभवत आहोत. या स्पर्धेमध्ये सीनियर गट (मुले-मुली) व सब-ज्युनियर गट (मुले-मुली) अशा एकूण ४२ संघांचा समावेश असणार आहे. ‘स्पोर्टबूट’ चॅनलमार्फत स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ कबड्डी संघटक अंकुश मोरे यांनी दिली. आधिक माहितीसाठी ९८१९९०४२०९ यावर संर्पक साधावा.

असा असेल महामुंबई कबड्डी प्रीमियर लीग – पर्व ३चा कार्यक्रम

  • महामुंबई कबड्डी प्रीमियर लीग – पर्व ३ व सुपर सीनियर (सब-ज्युनियर-सीनियर महिला/पुरुष) राज्यस्तरीय कबड्डी लीग (४० ते ५० वयोगट आणि ५०च्या पुढे वयोगट) (महिला व पुरुष) स्पर्धा २०२५
  • कालावधी: २६ एप्रिल ते ३ मे २०२५
  • वेळ: सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत
  • स्थळ: मीनाताई ठाकरे स्मृती क्रीडांगण (महानगर पालिका मैदान) न्यू म्हाडा कॉलनी, दिंडोशी, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६५.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content