Tuesday, September 17, 2024
Homeचिट चॅटभगवान महावीरांच्या विचारांच्या...

भगवान महावीरांच्या विचारांच्या प्रचार समितीत ललित गांधी

संपूर्ण विश्‍वाला शांति, अहिंसा व अपरिग्रहाचा संदेश देणारे 24वे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाण दिनाला 2550 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भगवान महावीरांचे विचार व कार्य अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यात अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांचाही अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

वर्षभर ही समिती संपूर्ण महाराष्ट्रात भगवान महावीर यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. शिक्षण संचालक (माध्यमिक), सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक या शासकीय सदस्यांबरोबरच माजी आमदार चैनसुख संचेती, पवन सिंघवी, हितेश मोता, सुरेंद्र शाह, नितीन वोरा, डॉ. के. एस. गंगवाल यांचा या समितीत समावेश आहे.

भगवान महावीरांच्या 2550व्या निर्वाण वर्षानिमित्त आयोजित करावयाचे सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांसाठी राज्यभर निबंध स्पर्धांचे आयोजन हे या समितीचे मुख्य विषय असतील असे ललित गांधी यांनी सांगितले. वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुका स्तरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम व गाव स्तरापर्यंत निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातील, असेही ते म्हणाले.

Continue reading

बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची बाग’!

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी हे उद्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध...

यापुढे ‘बाबू’ ठरवणार, सणवार कधी साजरे करायचे ते?

यापुढे मुहूर्त, रितीरिवाज, चालीरीती, परंपरा अशा सर्व बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे या महाराष्ट्रातील जनता सण, उत्सव साजरे करेल असे एकूण चित्र दिसते. आज होणारी ईद असो किंवा गणेशोत्सव, सरकारी बाबू म्हणतील त्याप्रमाणे हे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
error: Content is protected !!
Skip to content