Homeचिट चॅटभगवान महावीरांच्या विचारांच्या...

भगवान महावीरांच्या विचारांच्या प्रचार समितीत ललित गांधी

संपूर्ण विश्‍वाला शांति, अहिंसा व अपरिग्रहाचा संदेश देणारे 24वे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाण दिनाला 2550 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भगवान महावीरांचे विचार व कार्य अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यात अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांचाही अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

वर्षभर ही समिती संपूर्ण महाराष्ट्रात भगवान महावीर यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. शिक्षण संचालक (माध्यमिक), सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक या शासकीय सदस्यांबरोबरच माजी आमदार चैनसुख संचेती, पवन सिंघवी, हितेश मोता, सुरेंद्र शाह, नितीन वोरा, डॉ. के. एस. गंगवाल यांचा या समितीत समावेश आहे.

भगवान महावीरांच्या 2550व्या निर्वाण वर्षानिमित्त आयोजित करावयाचे सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांसाठी राज्यभर निबंध स्पर्धांचे आयोजन हे या समितीचे मुख्य विषय असतील असे ललित गांधी यांनी सांगितले. वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुका स्तरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम व गाव स्तरापर्यंत निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातील, असेही ते म्हणाले.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content