Homeचिट चॅटभगवान महावीरांच्या विचारांच्या...

भगवान महावीरांच्या विचारांच्या प्रचार समितीत ललित गांधी

संपूर्ण विश्‍वाला शांति, अहिंसा व अपरिग्रहाचा संदेश देणारे 24वे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाण दिनाला 2550 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भगवान महावीरांचे विचार व कार्य अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यात अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांचाही अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

वर्षभर ही समिती संपूर्ण महाराष्ट्रात भगवान महावीर यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. शिक्षण संचालक (माध्यमिक), सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक या शासकीय सदस्यांबरोबरच माजी आमदार चैनसुख संचेती, पवन सिंघवी, हितेश मोता, सुरेंद्र शाह, नितीन वोरा, डॉ. के. एस. गंगवाल यांचा या समितीत समावेश आहे.

भगवान महावीरांच्या 2550व्या निर्वाण वर्षानिमित्त आयोजित करावयाचे सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांसाठी राज्यभर निबंध स्पर्धांचे आयोजन हे या समितीचे मुख्य विषय असतील असे ललित गांधी यांनी सांगितले. वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुका स्तरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम व गाव स्तरापर्यंत निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातील, असेही ते म्हणाले.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content