Monday, May 12, 2025
Homeकल्चर +क्रिस्टीना पिस्जकोव्हा ठरली...

क्रिस्टीना पिस्जकोव्हा ठरली ७१वी मिस वर्ल्ड!

तब्बल २८ वर्षांनंतर भारतात आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत काल झेक प्रजासत्ताकची सौंदर्यवती क्रिस्टीना पिस्जकोव्हा ७१वी मिस वर्ल्ड ठरली. गेल्या वर्षाची मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का हिने क्रिस्टीना हिला मिस वर्ल्डचा मुकूट घातला. या सौंदर्य स्पर्धेत लेबनॉनची यास्मिना झायटौन उपविजेती ठरली. सिनी शेट्टीने भारताचे प्रतिनिधित्व करताना शीर्ष आठमध्ये स्थान मिळवले.

मिस वर्ल्ड स्पर्धेचा अंतिम सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. मिस वर्ल्ड स्पर्धा तब्बल २८ वर्षानंतर भारतात आयोजित करण्यात आली. मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेसाठी १२ जजचं पॅनल होतं. यामध्ये मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया मॉर्ले, मिस वर्ल्ड इंडियाचे चेयरमन जामिल सैदी, तीन माजी मिस वर्ल्ड यांच्यासह बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, अमृता फडणवीस, साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा समावेश होता. या सर्व सदस्यांनी मिस वर्ल्ड २०२४ या स्पर्धेचं परीक्षण केलं. 

प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर आणि २०१३मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मेगन यंगने यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. नेहा कक्कर, तिचा भाऊ टोनी कक्कर आणि शान यासारख्या प्रसिद्ध गायकांनी परफॉर्म केलं. या कार्यक्रमामुळे स्पर्धेला चार चांद लागले.

Continue reading

मंगळवारी ठाण्याच्या डॉ. घाणेकर नाट्यगृहात ‘प्री-वेडिंग’!

लव मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न करून पाहवं की लग्न करूच नये? पती-पत्नी यांचं नातं कल्पनेत आणि प्रत्यक्षात कसं असतं? अलीकडचे लग्नाच्या वयाचे तरुण-तरुणी या गुंत्यामध्ये अडकलेले असतात. नेमकं काय करावं? त्यांचा गोंधळ उडतो. निर्णय होत नाही. वय वाढत जातं.. आणि मग ठरतं.. 'प्री-वेडिंग'! .....

अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत एमडीसी अजिंक्य

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या राज्यस्तरीय सुपर लीग कॅरम स्पर्धेत राज्य ख्यातीचे कॅरमपटू रत्नागिरीची स्वरा मोहिरे, सार्थक केरकर, अमेय जंगम, वेदिका पोमेंडकर यांच्या एमडीसी ज्वेलर्स संघाने अजिंक्यपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात...

भारताविरोधात पाकिस्तान युद्ध पुकारणार?

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही चालूच असून पाकिस्तानचा एकूण पवित्रा पाहता लवकरच पाक भारताविरोधात युद्ध पुकारण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या राष्ट्राविरोधात युद्ध पुकारण्याचे पाप आपल्या माथी येऊ नये, मात्र युद्ध पुकारण्यासाठी पाकला भाग...
error: Content is protected !!
Skip to content