Homeमुंबई स्पेशलकृपाशंकर सिंह पुन्हा...

कृपाशंकर सिंह पुन्हा मुंबईत सक्रिय!

उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमधून भारतीय जनता पार्टीकडून खासदारकी मिळविण्यात अपयशी ठरलेले महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय झाले आहेत. विधानसभेच्या येत्या निवडणुकीतही आपल्या मुंबईतल्या परंपरागत सांताक्रूझ कलिना मतदारसंघातून भाग्य अजमविण्याची शक्यता आहे.

याकरीता कृपाशंकर सिंह यांनी तयारीही चालविली आहे. शनिवारी त्यांच्या तसेच काका बाप्टिस्ट उद्यानातल्या मॉर्निंग वॉकर्स यांच्या हस्ते काका बाप्टिस्ट उद्यान कालिना सांताक्रूझ पूर्व येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस उद्यानामध्ये १०० विविध देशी प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कृपाशंकर सिंह यांनी जौनपूरमधून भाजपाकडून निवडणूक लढवली होती.

रवींद्र वायकरांच्याही हस्ते झाले वृक्षारोपण

शनिवारीच लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी म्हणजेच अवघ्या ४८ मतांनी निवडून आलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनीही वृक्षारोपण केले. मुंबईतल्या त्यांच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या जोगेश्वरी पूर्व येथील शहीद अशोक कामटे मनोरंजन मैदानात मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागाच्या मदतीने ५०० झाडे लावण्यात आली.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content