Homeन्यूज ॲट अ ग्लांसवरळीत कोटक कुटुंबाने...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली इमारतीत ही खरेदी करण्यात आली आहे. या मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ 7,418 चौरस फूट आहे. या व्यवहारासाठी 12 कोटींहून अधिक स्टॅम्प ड्युटी आणि त्यासोबत अंदाजे साडेतीन लाख रुपये नोंदणीशुल्क भरले गेले आहे, असे समजते.

उदय कोटक यांनी सप्टेंबर 2023पर्यंत कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून काम पाहिले आहे. आजही त्यांचा बँकेत सुमारे 25% हिस्सा आहे. वरळी सी

फेसवरील या इमारतीत कोटक कुटुंबाने एकत्रित 12 अपार्टमेंट फ्लॅटस् खरेदी केले आहेत, ज्याची किंमत प्रति चौरस फूट 2.71 लाख रुपये इतकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक व्यवहार अधिकृतपणे 30 जानेवारी रोजी नोंदणीकृत झाले तर 5 फेब्रुवारी रोजी एक अतिरिक्त व्यवहार नोंदवण्यात आला.

कोटक यांनी शिव सागर इमारतीत खरेदी केलेले हे अपार्टमेंट फ्लॅट्स तळमजला, पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर आहेत. या फ्लॅट्समधून अरबी समुद्र आणि मुंबई कोस्टल रोडचे दृश्य दिसते. अनेक प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्ती या परिसरात राहतात. कोटक यांनी खरेदी केलेल्या या 12 फ्लॅट्सचा कार्पेट एरिया 173  ते 1,396 चौरस फूट आहे. ही जागा एकूण 7,418 चौरस फूट आहे. 2018मध्ये, उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने आता बंद पडलेल्या वाइन कंपनी इंडेज विंटनर्सचे कार्यकारी संचालक रणजित चौगुले यांच्याकडून वरळी सी फेस येथे एक प्रशस्त बंगला 385 कोटी रुपयांना विकत घेतला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे 12 नवीन फ्लॅट्स या बंगल्याशेजारील इमारतीत आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content