Wednesday, March 12, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसवरळीत कोटक कुटुंबाने...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली इमारतीत ही खरेदी करण्यात आली आहे. या मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ 7,418 चौरस फूट आहे. या व्यवहारासाठी 12 कोटींहून अधिक स्टॅम्प ड्युटी आणि त्यासोबत अंदाजे साडेतीन लाख रुपये नोंदणीशुल्क भरले गेले आहे, असे समजते.

उदय कोटक यांनी सप्टेंबर 2023पर्यंत कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून काम पाहिले आहे. आजही त्यांचा बँकेत सुमारे 25% हिस्सा आहे. वरळी सी

फेसवरील या इमारतीत कोटक कुटुंबाने एकत्रित 12 अपार्टमेंट फ्लॅटस् खरेदी केले आहेत, ज्याची किंमत प्रति चौरस फूट 2.71 लाख रुपये इतकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक व्यवहार अधिकृतपणे 30 जानेवारी रोजी नोंदणीकृत झाले तर 5 फेब्रुवारी रोजी एक अतिरिक्त व्यवहार नोंदवण्यात आला.

कोटक यांनी शिव सागर इमारतीत खरेदी केलेले हे अपार्टमेंट फ्लॅट्स तळमजला, पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर आहेत. या फ्लॅट्समधून अरबी समुद्र आणि मुंबई कोस्टल रोडचे दृश्य दिसते. अनेक प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्ती या परिसरात राहतात. कोटक यांनी खरेदी केलेल्या या 12 फ्लॅट्सचा कार्पेट एरिया 173  ते 1,396 चौरस फूट आहे. ही जागा एकूण 7,418 चौरस फूट आहे. 2018मध्ये, उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने आता बंद पडलेल्या वाइन कंपनी इंडेज विंटनर्सचे कार्यकारी संचालक रणजित चौगुले यांच्याकडून वरळी सी फेस येथे एक प्रशस्त बंगला 385 कोटी रुपयांना विकत घेतला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे 12 नवीन फ्लॅट्स या बंगल्याशेजारील इमारतीत आहेत.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content