Homeबॅक पेजकिंजल कुमारीची तुफान...

किंजल कुमारीची तुफान फटकेबाजी..

यष्टिरक्षक फलंदाज किंजल कुमारीच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर साईनाथ एस. सी.ने यजमान स्पोर्टिंग युनियनचा ७७ धावांनी पराभव केला. चौथी अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेत साईनाथचा हा सलग दुसरा विजय. त्यामुळे त्यांचा “अ” गटातून उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित झाला आहे. किंजलने केवळ ५४ चेंडूंमध्ये १७ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ११५ धावांची अपराजित खेळी केली. स्पोर्टिंग युनियनने साईनाथच्या ३ बाद २२५ ला ७ बाद १४८ धावा असे प्रतिउत्तर दिले. एका अन्य सामन्यामध्ये एमआयजी क्लबने युरोपेमचा ९ विकेटनी पराभव करताना प्रतिस्पर्ध्यांची २ बाद १५२, ही धावसंख्या केवळ १४.४ षटकात पार केली.

कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेमचे पाठबळ लाभलेल्या या स्पर्धेमध्ये किंजलने नॅशनल विरुद्ध ५१ धावांची नाबाद खेळी करुन साईनाथला ६ विकेटने विजयी केले होते. यजमान स्पोर्टिंग युनियनची अंजली सिंग हिने सलामीला येत ७० धावा केल्या खऱ्या पण भावना सानप (२८), हिच्याशिवाय तिला अन्य कोणाची साथ लाभली नाही. एमआयजीच्या विजयामध्ये मेहेक मेस्त्री (नाबाद ६४) हिचे योगदान महत्त्वाचे ठरले.

संक्षिप्त धावफलक-

युरोपेम- २० षटकात २ बाद १५२ (रिया पवार ७९ नाबाद, आदिती कदम २४) पराभूत विरुद्ध एमआयजी सी सी १४.४ षटकात १ बाद १५३ (मेहेक मेस्त्री ६४ नाबाद, हीर कोठारी ३८ नाबाद, अनिषा राऊत २६). सर्वोत्तम खेळाडू- मेहेक मेस्त्री

साईनाथ ए सी- २० षटकात ३ बाद २२५ (किंजल कुमारी ११५ नाबाद, निधी घरत ३६ नाबाद, कियारा परेरा २३) वि. वि. स्पोर्टिंग युनियन २० षटकात ७ बाद १४८ (अंजली सिंग ७०, भावना सानप २८, आंशू पाल १३/२). सर्वोत्तम खेळाडू- किंजल कुमारी

एम आय जी सी सी- २० षटकात ५ बाद १२० (मिताली गोवेकर ३६, अनिषा राऊत ४३, सानिया हुसेन २०/२, श्रेया एस. २२/२) पराभूत वि. डॅशिंग एस सी १९.४ षटकात ७ बाद १२१ (किमया राणे ३६, सामिया हुसेन २४, उन्नती नाईक २२, अनिषा राऊत २२/२). सर्वोत्तम खेळाडू- सामिया हुसेन

नॅशनल सी सी- २० षटकात ७ बाद ११४ (तनिषा शर्मा नाबाद २२) पराभूत वि. साईनाथ एस सी १९.४ षटकात ४ बाद ११६ (सेजल विश्वकर्मा २२, किंजल कुमारी नाबाद ५१, कियारा परेरा २९, आर्या उमेश २२/२). सर्वोत्तम खेळाडू- किंजल कुमारी

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content