Homeचिट चॅटकुर्ल्यात शालेय मुलांचे...

कुर्ल्यात शालेय मुलांचे कबड्डी शिबिर संपन्न

गोरखनाथ महिला संघ, हनुमान क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने ज्ये‌ष्ठ राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच प्रशिक्षक बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथील गांधी मैदानात शालेय मुलांसाठी पाच दिवसांचे मोफत कबड्डी प्रशिक्षण शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले. 50पेक्षा जास्त शालेय मुलांनी या शिबिरात सहभाग घेतला. सायंकाळच्या सत्रात अडीच तास या मुलांना कबड्डी खेळाचे धडे देण्यात आले. या प्रशिक्षणवर्गात कबड्डी सराव कसा करावा, कबड्डी खेळाचे कौशल्य कसे वाढवावे, ते वाढवण्यासाठी कोणते व्यायामप्रकार करावेत याचे मार्गदर्शन रोहित मोरे, वेदांत महाडिक, ओंकार वेताळ यांनी केले.

निवेदक प्रतीक गाढवे यांनी मुलांना या खेळातील विविध कौशल्य प्रात्यक्षिकांसह दाखवून दिली. कबड्डीतील नियमांची माहिती गौरी महाडिक, प्रतीक्षा गाडगे या मुंबई उपनगरच्या पंचांनी करून दिली. या शिबिरात राष्ट्रीय खेळाडू सचिन आयरे, एअर इंडियाचे खेळाडू नितीन घाग, बी.पी.सी.ए.चे सदस्य दीपक कांदळगावकर, सन्मित्र क्रीडा मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू सोहम पुंदे, राष्ट्रीय पंच महादेव घाणेकर यांनी भेट देऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले. सदर शिबिर आयोजन करण्यासाठी गौरीशंकर क्रीडा मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व शिबिरार्थींना पदके दिली. त्यांच्या शाळांनादेखील गौरवचिन्ह भेट देण्यात आली. दररोज खेळाडूंना खाऊचे वाटप करण्यात आले. यंदा प्रथमच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भावी काळात असेच नियमित शिबिराचे व त्याबरोबरच या मुलांसाठी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये स्पर्धा घेण्याचा आयोजकांचा मानस आहे, असे क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक यांनी सांगितले.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content