Homeडेली पल्सपरभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता.

विधानसभेत या विषयावर गेले दोन दिवस झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीने झालेला नाही, हे स्पष्ट केले. स्वतः सूर्यवंशी यांनी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध थर्ड डिग्री किंवा तत्सम कोणत्याही प्रकारे बळाचा वापर केलेला नाही, हे सांगितले असून तसे व्हिडियो शूटिंगही उपलब्ध आहे. सूर्यवंशी यांचे स्वतःचे निवेदनही तसेच आहे. सूर्यवंशी यांना श्वसनाचा विकार होता. त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी पोटात जळजळ झाल्याने रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा त्यांचा मृत्यू ओढवला, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केसे. सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content