Homeएनसर्कलनोकरी शोधणारे मुकेश...

नोकरी शोधणारे मुकेश झाले नोकरी देणारे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत विकसित भारत संकल्प यात्रेच्या (VBSY) लाभार्थींशी नुकताच संवाद साधला. त्यात कर्नाटकातील तुमकुर येथील गृहोपयोगी वस्तूंचे दुकान मालक आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे (VBSY) लाभार्थी मुकेश यांनी संवाद साधताना पंतप्रधानांना सांगितले की त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 4.5 लाख रुपयांचे, पीएम मुद्रा योजनेचे कर्ज मिळाले असून ते सध्या या दुकानात 3 लोकांना रोजगार देत आहेत. मुकेश हे नोकरी शोधणार्‍या व्यक्तीपासून नोकरी प्रदाता बनले आहेत.

लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थींपर्यंत वेळेत पोहोचेल, याची खात्री करून सरकारच्या प्रमुख योजनांच्या उद्देशाची परिपूर्णता करण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा हाती घेण्यात येत आहे.

मुकेश यांनी, त्यांना मुद्रा कर्ज आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार बँकांकडून मिळणाऱ्या कर्ज प्रक्रिया सुलभतेबद्दल माहिती देणाऱ्या एका प्रसारमाध्यम पोस्टबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी मुकेश यांना आजच्या 50 टक्के डिजिटल व्यवहारांच्या तुलनेत, सर्व व्यवहार पूर्णपणे यूपीआय आणि डिजिटल पेमेंटमार्फत स्वीकारण्याची सूचना केली, कारण यामुळे बँकेकडून आणखी गुंतवणूक करण्यात मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, मुकेश हे भारतातील युवा वर्गाच्या लवचिकतेचे आणि दृढनिश्चयाचे उदाहरण आहेत, ज्यांना केवळ नोकऱ्यांचीच इच्छा नाही तर रोजगार निर्मितीचीही इच्छा आहे. देशातील तरुणांना पाठिंबा देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content