Saturday, March 29, 2025
Homeबॅक पेजठाकरे मुख्यमंत्री असताना...

ठाकरे मुख्यमंत्री असताना ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रखडली?

ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग-5 प्रकल्पामध्ये स्थापत्य कामाच्या खर्चात सध्यातरी कोणतीही वाढ झाली नसली तरी 3 वर्षांची प्रकल्प दिरंगाई झालेली आहे. आरटीआयच्या माध्यमातून उघड झालेल्या या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरता यावर प्रकाश टाकला गेला आहे. मेट्रोचे काम ज्या कालखंडात होणे अपेक्षित होते त्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, ज्याचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत होते.

मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती अधिकारातून विविध माहिती विचारली गेली होती. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने त्यावर सविस्तर माहिती अर्जदारास दिली. मुंबई मेट्रो मार्ग-5 ठाणे-भिवंडी-कल्याणचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला 1 सप्टेंबर 2019 रोजी देण्यात आले. हा 15 स्थानके असलेला 24.90 किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. हे काम 1 मार्च 2022 रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. आता नवीन डेडलाईन ही 31 मार्च 2025 अशी आहे.

ठाणे

वेळेत काम पूर्ण न करण्यासाठी ठेकेदारावर दंडात्मक कारवाईची मागणी आरटीआय कार्यकर्त्यांनी केली होती. मुंबई मेट्रो मार्ग-5 ठाणे-भिवंडी-कल्याण या प्रकल्पाचा स्थापत्य कामाचा अपेक्षित खर्च हा 898.19 कोटी इतका आहे. सध्यातरी वाढीव खर्च झालेला नाही. 3 वर्षांची दिरंगाई लक्षात घेता दंडात्मक कारवाई करताना केवळ 20.88 लाख इतका दंड आकारण्यात आला आहे.

मेट्रो 5 महत्त्वाचा मार्ग असून सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग-4 (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग-12 (कल्याण ते तळोजा) आणि मध्य रेल्वे यांच्यात परस्पर एकीकरण साधण्यात येईल. व्यावसायिक व शासकीय कर्मचारी तसेच ठाणे, भिवंडी व कल्याण परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा मेट्रो मार्ग उत्तम सुविधा प्रदान करेल. हा मेट्रो मार्ग सध्याच्या प्रवासाची वेळ 50 ते 75%पर्यंत कमी करणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडून ही माहिती प्राप्त केली आहे.

Continue reading

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास!

पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा...

कांदा होणार आणखी स्वस्त! निर्यातशुल्क हटवले!!

महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेत या महिन्यापासून कांद्याची आवक वाढली आहे, ज्यामुळे किंमती घसरल्या आहेत. कांदा स्वस्त झाला आहे. 21 मार्च 2025 रोजी लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांद्याचा भाव अनुक्रमे 1330 आणि 1325 रुपये प्रति क्विंटल होता. कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी कांद्याचे रब्बी उत्पादन 227 लाख मेट्रिक...

सचिनभाऊ चषक शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या आमदार सचिनभाऊ अहिर चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. निर्णायक बोर्डपर्यंत पिछाडीवर राहिलेल्या प्रसन्नने अचूक फटकेबाज खेळ करणाऱ्या...
Skip to content