Homeडेली पल्सअवघ्या ३ महिन्यांतच...

अवघ्या ३ महिन्यांतच नितीश कुमार यांचा बिहारला बायबाय?

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेणारे नितीश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. येत्या १६ मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते राज्यसभेवर जाण्याची शक्यता असून त्यांचे पुत्र निशांत कुमार बिहार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होतील तर मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीच्या चेहऱ्याची वर्णी लागू शकते.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणुकांना सामोरे जात घवघवीत यश मिळवले. या निवडणुकीच्या वेळेपासूनच नितीश कुमार यांच्या आजारपणाची चर्चा होती. ७५ वर्षीय नितीश कुमार यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. त्याचवेळी ते आपले पुत्र निशांत कुमार यांना आपला उत्तराधिकारी म्हणून पुढे आणतील, अशी अटकळ होती. परंतु घराणेशाहीला नैतिकदृष्ट्या विरोध करण्याच्या प्रयत्नात हे झाले नाही. भाजपानेही आपण नितीश कुमार यांच्याकडील मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतल्याचा आरोप टाळण्यासाठी नितीश कुमार यांनाच बिहारच्या मुख्यमंत्रीपदी बसवले. २० नोव्हेंबर २०२५ रोजी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांचा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. त्यामुळे आज सकाळी भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी पाटण्यात नितीश कुमार यांची भेट घेत त्यांना राज्यसभेवर जाण्याचा सल्ला दिला. बिहारचे मुख्यमंत्रीपद तुमच्या जनता दल युनायटेड पक्षाकडेच राहू द्यावे, जदयुच्या भवितव्याकरीता आपण मुलगा निशांत कुमार यांना राजकारणात सक्रीय करावे, असा सल्ला नितीन नवीन यांनी दिल्याचे कळते.

त्यानंतर, नितीश कुमार यांनी आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेते लल्लन सिंह, संजय झा, मंत्री श्रवण कुमार आदींशी दीर्घ चर्चा केली. नितीश कुमार कुशवाह समाजाचे आहेत. या समाजावर असलेली पक्षाची पकड टिकवून ठेवायची असेल तर त्यांनी आताच निशांत कुमार यांना राजकारणात आणावे. बिहार सरकारमध्ये त्यांचा समावेश करावा, पक्षाच्या संघटनेतही महत्त्वाचे पद द्यावे, यावर सर्वांचे एकमत झाले. राज्यसभा निवडणुकीसाठी उद्या उमेदवारीअर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या नितीश कुमार आपला राज्यसभेचा उमेदवारीअर्ज दाखल करतील, असे समजते. निशांत कुमार नवखे असल्यामुळे त्यांना थेट मुख्यमंत्रीपदी बसवले जाणार नाही. त्यामुळे जदयुमधली गटबाजी उफाळू शकते. त्यामुळेच निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवून भाजपा मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेण्याची शक्यता आहे.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content