Homeएनसर्कलभारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान...

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आजपासून!

जैवतंत्रज्ञान विभाग (डी. बी. टी.) संस्थेचे प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्र फरीदाबाद (हरियाणा) येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट येथे आजपासून भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव सुरू होत आहे. हा भव्य विज्ञान मेळा आज, 17 जानेवारीला सुरू होईल तर 20 जानेवारीला त्याची सांगता होईल. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, राष्ट्रीय नवोन्मेष फाउंडेशन ह्या स्वायत्त संस्थेच्या सहकार्याने, या नवव्या विज्ञान महोत्सवाचे आयोजन आणि अंमलबजावणी करणार आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयात, भारताच्या कामगिरीचा, यशाचा उत्सव साजरा करणे हा या विज्ञान महोत्सवाचा उद्देश आहे. त्याशिवाय, विज्ञानप्रेमींच्या कामगिरीची दखल घेणे आणि युवा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणे आणि भारतीय नागरिकांमध्ये त्याचा प्रसार करणे हा देखील महोत्सवाचा उद्देश आहे. राष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 ची मध्यवर्ती संकल्पना ‘अमृतकाळात विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे’ ही आहे.

विज्ञान

यंदाच्या म्हणजेच, विज्ञान महोत्सवामध्ये 22 देश सहभागी होत आहेत. यात अर्जेंटिना, आर्मेनिया, ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, केनिया, लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक, मलेशिया, म्यानमार, नामिबिया, फिलीपिन्स, रवांडा, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, थायलंड, इंग्लंड, अमेरिका, व्हिएतनाम आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान महोत्सवाच्या चारही दिवसांसाठी खालील कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

यात विद्यार्थी विज्ञान गाव (सायन्स व्हीलेज), विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे नवे प्रयोग आणि शोध प्रत्यक्ष जाणून घेणे, खेळ आणि खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञान, विद्यार्थी नवोन्मेष महोत्सव-स्पेस हॅकेथॉन, राज्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि केंद्र आणि राज्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सचिव आणि अधिकारी यांची परिषद, आकांक्षी भारतासाठी शिक्षण-राष्ट्रीय विज्ञान शिक्षक कार्यशाळा, युवा शास्त्रज्ञ परिषद, नवीन युग तंत्रज्ञान प्रदर्शन, राष्ट्रीय सामाजिक संघटना आणि संस्थांची बैठक, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष प्रदर्शन, स्टार्ट-अप, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष बी टू बी मीट म्हणजे, व्यावसायिकांची परस्पर बैठक यांचा समावेश आहे.

Continue reading

आता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांतच मिळणार एसटीचे पास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यामुळे आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी...

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढच्या २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदूर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या...

पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या परदेशवारीसाठी रवाना

पाकिस्तानवरच्या लष्करी कारवाईनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याकरीता रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेटी देतील. येत्या ते 19 जूनला पंतप्रधान मोदी मायदेशी परततील. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन...
Skip to content