Homeएनसर्कलआयएनएस कदमत जपानच्या...

आयएनएस कदमत जपानच्या योकोसुका बंदरावर…

आयएनएस कदमत ही उत्तर प्रशांत महासागरात तैनातीवर असलेली युद्धनौका जपानमध्ये योकोसुका येथे दाखल झाली असून आज तेथे भारतीय समुदायाच्या उपस्थितीत नौदल दिन साजरा करण्यात येईल.

परवा, 2 डिसेंबरला ही युद्धनौका योकोसुका येथे दाखल झाली. व्यावसायिक संवाद आणि सामुदायिक कल्याण उपक्रमांसह ऑनबोर्ड भेटींचे या वास्तव्यादरम्यान नियोजन आहे. जपान मेरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स (JMSDF) सोबत होणाऱ्या संवादात परस्परांच्या जहाजांना भेटी, संकल्पनांची व्यावसायिक स्तरावर देवाणघेवाण, संयुक्त योग शिबिर आणि सागरी भागीदारी सरावासाठी समन्वय बैठकीचा समावेश आहे. योकोसुका येथे आज जपानमधील अलीकडेच 28 नोव्हेंबर 2023 रोजी आयएनएस कदमतने जेएमएसडीएफच्या जेएस टोवाडा या जलदगतीच्या युद्धविषयक पाठबळ देणाऱ्या जहाजासोबत इंधन पुनर्भरण हाती घेणार आहे. दोन्ही नौदलांदरम्यान करार झालेल्या रेसिप्रोकल प्रोव्हिजनिंग ऑफ सप्लाय अँड सर्विसेस अंतर्गत हे पुनर्भरण होत आहे.

हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत आणि जपान यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून त्यांच्यातील सागरी सहकार्याला आणखी चालना देण्याच्या उद्देशाने आयएनएस कदमतच्या जपान भेटीचे आणि जेएमएसडीएफसोबत संवादाचे नियोजन करण्यात आले आहे. आयएनएस कदमत ही एक स्वदेशी बनावटीची पाणबुडीविरोधी युद्धसज्जता असलेली युद्धनौका असून अत्याधुनिक पाणबुडीविरोधी शस्त्रप्रणालीने सुसज्ज आहे.

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content