Homeन्यूज अँड व्ह्यूजनवोन्मेष हे एकट्या...

नवोन्मेष हे एकट्या शास्त्रज्ञांचे क्षेत्र नाही!

नवोन्मेष आणि तंत्रज्ञानामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील गैरसोयी दूर होऊ शकतात, असे मत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल व्यक्त केले. नवोन्मेष हे एकट्या शास्त्रज्ञांचे क्षेत्र नाही तर कोणतीही व्यक्ती मानसिकता आणि दृष्टिकोन बदलून नावीन्यपूर्ण उपक्रम संकल्पित करु शकते, असे ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ. जितेंद्र सिंह, नवी दिल्ली येथे क्षमता विकास आयोगाद्वारे संकलित केलेल्या सार्वजनिक प्रशासनातील नवोन्मेषावरील प्रबंधाचे औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते.

तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये नवोन्मेष आणि संस्थात्मक नवकल्पना याद्वारे नागरिकांचे जीवन सुसह्य करणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. नवोन्मेषाची कल्पना साध्या राहणीमानाच्या पलीकडे जाणारी असून वर्तनात सामाजिक बदल घडवून संपूर्ण समाजाला अनेक फायदे मिळवून देते, असे त्यांनी सांगितले.

अनेक नवोन्मेषी कल्पना सध्याच्या वातावरणात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानामुळे देशातील नागरिकांना जीवन सुकर बनवणारे अनेक पर्याय उपलब्ध करून देत आहेत. पुढील दशकात भारताला डिजिटल क्षेत्रात सशक्त असलेला समाज आणि ज्ञानाच्या अर्थव्यवस्थेत रुपांतरीत करण्यात डिजिटल नवोन्मेष महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चित्रपट आणि चित्रफितींच्या माध्यमातून समाज माध्यमाद्वारे व्यापक प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येत असल्याच्या कारणामुळे, क्षमता निर्माण आयोगाने चित्रपट आणि चित्रफितीद्वारे सार्वजनिक प्रशासनातील नवोन्मेषाचा प्रचार करावा असे निर्देश डॉ. सिंह यांनी दिले.

क्षमता निर्माण आयोगाला 25 राज्यांमधून कृषी, रेल्वे, उपजीविका, जलसंधारण यासारख्या विविध 13 क्षेत्रातील 243 नवकल्पना प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती आयोगाचे सदस्य डॉ. आर बालसुब्रमण्यम यांनी दिली. यापैकी, तीन स्तरीय कठोर निवड प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या 15 नवोन्मेषांचा या प्रबंधात समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले. या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात...
Skip to content