Homeन्यूज अँड व्ह्यूजनवोन्मेष हे एकट्या...

नवोन्मेष हे एकट्या शास्त्रज्ञांचे क्षेत्र नाही!

नवोन्मेष आणि तंत्रज्ञानामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील गैरसोयी दूर होऊ शकतात, असे मत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल व्यक्त केले. नवोन्मेष हे एकट्या शास्त्रज्ञांचे क्षेत्र नाही तर कोणतीही व्यक्ती मानसिकता आणि दृष्टिकोन बदलून नावीन्यपूर्ण उपक्रम संकल्पित करु शकते, असे ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ. जितेंद्र सिंह, नवी दिल्ली येथे क्षमता विकास आयोगाद्वारे संकलित केलेल्या सार्वजनिक प्रशासनातील नवोन्मेषावरील प्रबंधाचे औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते.

तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये नवोन्मेष आणि संस्थात्मक नवकल्पना याद्वारे नागरिकांचे जीवन सुसह्य करणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. नवोन्मेषाची कल्पना साध्या राहणीमानाच्या पलीकडे जाणारी असून वर्तनात सामाजिक बदल घडवून संपूर्ण समाजाला अनेक फायदे मिळवून देते, असे त्यांनी सांगितले.

अनेक नवोन्मेषी कल्पना सध्याच्या वातावरणात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानामुळे देशातील नागरिकांना जीवन सुकर बनवणारे अनेक पर्याय उपलब्ध करून देत आहेत. पुढील दशकात भारताला डिजिटल क्षेत्रात सशक्त असलेला समाज आणि ज्ञानाच्या अर्थव्यवस्थेत रुपांतरीत करण्यात डिजिटल नवोन्मेष महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चित्रपट आणि चित्रफितींच्या माध्यमातून समाज माध्यमाद्वारे व्यापक प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येत असल्याच्या कारणामुळे, क्षमता निर्माण आयोगाने चित्रपट आणि चित्रफितीद्वारे सार्वजनिक प्रशासनातील नवोन्मेषाचा प्रचार करावा असे निर्देश डॉ. सिंह यांनी दिले.

क्षमता निर्माण आयोगाला 25 राज्यांमधून कृषी, रेल्वे, उपजीविका, जलसंधारण यासारख्या विविध 13 क्षेत्रातील 243 नवकल्पना प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती आयोगाचे सदस्य डॉ. आर बालसुब्रमण्यम यांनी दिली. यापैकी, तीन स्तरीय कठोर निवड प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या 15 नवोन्मेषांचा या प्रबंधात समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content