Homeहेल्थ इज वेल्थभारतातील पहिले स्वदेशी...

भारतातील पहिले स्वदेशी एमआरआय स्कॅनर झाले लाँच!

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काल भारतातील पहिल्या स्वदेशात विकसित, परवडणाऱ्या, हलक्या, अल्ट्राफास्ट, हाय फील्ड (1.5 टेस्ला), पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (MRI) स्कॅनरचा नवी दिल्ली येथे प्रारंभ केला.

स्वदेशी एमआरआय स्कॅनर उपलब्ध करून दिल्याने, एमआरआय स्कॅनिंगची किंमत सामान्य माणसासाठी लक्षणीयरीत्या परवडणारी होईल अशी अपेक्षा आहे. तसेच सध्या उच्च दरात उपलब्ध असणारी एमआरआय स्कॅनिंग सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारातून एमआरआय स्कॅनरच्या खरेदीतील भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुहेरी उद्दिष्ट तसेच आत्मनिर्भरतेचे एकूण उद्दिष्ट पूर्ण होऊन भारतातील निदान उपकरणे आणि उपचारात्मक उत्पादने अत्याधुनिक बनतील असेही ते म्हणाले. येत्या काही वर्षात “मेक इन इंडिया-मेड फॉर द वर्ल्ड” असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय बायोफार्मा मिशन अंतर्गत, व्होक्सलग्रिड्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने देशाची गरज पूर्ण करण्यासाठी कॉम्पॅक्ट, हलके, अत्याधुनिक एमआरआय स्कॅनर विकसित केला आहे, अशी माहिती डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.

जागतिक दर्जाचे एमआरआय स्कॅनर विकसित करण्यासाठी खर्च करण्यात आलेल्या 17 कोटी रुपयांपैकी 12 कोटी रुपये जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (BIRAC) द्वारे प्रदान करण्यात आल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content