Homeपब्लिक फिगरभारतीय समस्यांसाठी भारतीय...

भारतीय समस्यांसाठी भारतीय उपाय!

भारतीय समस्यांसाठी भारतीय उपाय आणि भारतीय सृजनशीलतेसाठी भारतीय माहिती संकलन आणि अगदी मानवी वैशिष्ट्येसुद्धा उर्वरित जगापेक्षा निराळी आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी विज्ञान भारतीच्या 6व्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले.

पुण्यात एमआयटी- एडीटी विद्यापीठ इथे ते बोलत होते. पारंपरिक ज्ञान ही आमची अनन्यसाधारण संपत्ती आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दोन्ही जगतातील सर्वोत्तम गोष्टी मिळवण्यासाठी ‘पारंपरिक ज्ञान अंकेक्षित ग्रंथालय’ सुरू केले आहे. प्राचीन औषधांबद्दल पूर्वग्रह असलेल्या लोकांना कोविड काळात त्यांचे मत बदलावे लागले. तथाकथित प्रगत देशांमधील लोक महामारीच्या काळात कोणत्याही आयुर्वेदिक उपचारांसाठी आपल्यापर्यंत पोहोचायचे असे त्यांनी सांगितले.

भारताची वैज्ञानिक क्रांती 2014मध्ये 350 स्टार्टअप्सवरून 2024मध्ये जवळपास 1.5 लाख झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणकांची पूर्तता करून भारताने स्वत:चे असे मानकही प्रस्थापित केले आहे. जागतिक स्टार्टअपमध्ये भारत आता तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे जगाला अवगत झाले आहे. जागतिक सृजनशीलता निर्देशांकात भारत 2014मधील 81व्या स्थानावरून 40व्या स्थानावर पोहोचला आहे. विज्ञानात सर्वाधिक पीएचडी करणाऱ्यांमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत, असे त्यांनी सांगितले.

विज्ञानाचे विद्यार्थी असल्याने आम्हाला पुराव्यानिशी बोलायला शिकवले जाते आणि भारतीयत्वावरील आमचा विश्वास हा केवळ राष्ट्रीय अभिमान नसून तो सुयोग्य वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहे. सांस्कृतिक तसेच भांडवली संसाधनांसह पूरक सामूहिक प्रयत्नांनी सार्वजनिक-खासगी क्षेत्रात एकत्रित काम करावे, असे आवाहमही डॉ. सिंह यांनी केले.

डॉ. सतीश रेड्डी, डॉ. विजय भटकर, डॉ. शेखर मांडे, स्वामी श्रीकांतानंद महाराज, प्रा. विश्वनाथ कराड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content