Homeएनसर्कल169पैकी 154 मते मिळवत...

169पैकी 154 मते मिळवत भारताची आयएमओ परिषदेवर फेरनिवड

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (आयएमओ) परिषदेत भारताची श्रेणी ‘ब’मध्ये फेरनिवड झाली आहे. यात, आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक रस असलेल्या 10 देशांचा समावेश आहे. लंडनमधल्या 34व्या आयएमओ असेम्ब्लीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारताने या श्रेणीत सर्वाधिक मते मिळवली. 169 वैध मतांपैकी 154 मते मिळवण्यात भारताला यश आले.

केंद्रीय बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हा निकाल भारताच्या वाढत्या जागतिक सागरी प्रभावाला मिळालेले मोठे समर्थन असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या इंडिया मेरीटाईम वीकच्या यशस्वी आयोजनानंतर लगेचच भारताची फेरनिवड झाली आहे. यात 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारताच्या विकसित होत असलेल्या सागरी क्षमता यात प्रदर्शित झाल्या होत्या. या कार्यक्रमाने गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा अवलंब, बंदरप्रणित विकास आणि सागरी सुरक्षा यावरील चर्चेसाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले. त्याचे फलित या निवडणुकीत मिळाले.

आयएमओमध्ये भारताचे महत्त्व वाढत असून सलग दुसऱ्या कार्यकाळात देशाने ब श्रेणीमध्ये सर्वाधिक मते मिळवली आहेत. अधिकाऱ्यांनी या कामगिरीचे वर्णन अमृतकाल सागरी व्हिजन 2047ला गती देण्यासाठी हा एक मैलाचा दगड असल्याचे म्हटले आहे. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सागरी केंद्रात रूपांतरित करण्यासाठी हा दीर्घकालीन आराखडा आहे. या उपक्रमाला  मोदी स्वतः मार्गदर्शन करत असून सोनोवाल यांच्यासह बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर त्याचे नेतृत्त्व करत आहेत.

आयएमओ परिषदेत निवडून आलेले 40 सदस्यदेश आहेत जे तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. असेंब्लीदरम्यान भारतीय शिष्टमंडळाने अनेक देश, आंतरराष्ट्रीय सागरी संघटना आणि आयएमओ अधिकाऱ्यांसोबत सागरी सुरक्षा, सागरी डिजिटलायझेशन, हरित नौवहन, नाविकांचे कल्याण आणि बंदर विकासात भागिदारी वाढवण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठका घेतल्या. भारताव्यतिरिक्त, आयएमओ असेंब्लीने ब श्रेणीमध्ये काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक रस असलेल्या 10 सदस्य देशांना निवडले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांचा समावेश आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content