Homeपब्लिक फिगर2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था...

2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर

भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत आता 5व्या क्रमांकावर असून 2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर येऊन भारत जगात जागतिक महासत्ता होईल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकताच व्यक्त केला.

दुबईमधील बुर दुबईतील एम स्क्वेअर येथील हिल्टन डबल ट्री, या हॉटेलमध्ये इंडियन बिझनेस अँड प्रोफेशनल काऊन्सिलतर्फे ग्रीन माईंड्स, या  प्रदूषणविरहित पर्यावरणासाठी पुनर्वापर आणि चिरकाल टिकणारे उपाय, या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी संयुक्त अरब अमीरात सरकारचे  पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया विषयाचे सल्लागार महेर अल काबी रीना वीज; विजय बैंस; समिअल्लाह खान; कार्तिक रमण आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश सर्व आघाड्यांवर सर्व क्षेत्रात प्रगती करीत असून संपूर्ण जगातून  भारतात उद्योग, व्यवसाय विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढत आहे. भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. संयुक्त अरब अमीरात आणि भारताने संयुक्तपणे प्रयत्न करून दोन्ही देशांत व्यापार-उद्योग वाढविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

संयुक्त अरब अमीरातचे राजे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये विशेषतः दुबईत मोठ्या प्रमाणात भारतीय व्यापार आणि वास्तव्य करीत आहेत. त्यांना कोणताही त्रास नाही. त्यांना सरकारचे चांगले सहकार्य मिळत असते. भारताची राजधानी दिल्ली आहे आणि आर्थिक राजधानी मुंबई आहे तसेच संयुक्त अरब अमीरातची राजधानी अबुधाबी आहे आणि आर्थिक राजधानी दुबई आहे. संयुक्त अरब अमीरात आणि भारत या दोन्ही देशांनी मिळून पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देऊ; व्यापार-उद्योग वाढवू तसेच जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करूया. भारतात मोदी सरकारच्या नेतृत्त्वात सौर ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती आणि वापर होत आहे. प्लास्टिकमुक्त शहरे करण्यासाठी भारतात प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने जगात सर्वच देशांनी पर्यावरण रक्षणाचा संवर्धनाचा विचार करावा असे आवाहनही रामदास आठवलेंनी केले.

या परिषदेस भारतातून रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, तोसिफ पाशा आणि जावेद अहमद उपस्थित होते. 

Continue reading

युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे यश

प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलने सर्वाधिक पदके जिंकून शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत ठाणे आणि...

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...
Skip to content