Homeपब्लिक फिगर2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था...

2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर

भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत आता 5व्या क्रमांकावर असून 2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर येऊन भारत जगात जागतिक महासत्ता होईल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकताच व्यक्त केला.

दुबईमधील बुर दुबईतील एम स्क्वेअर येथील हिल्टन डबल ट्री, या हॉटेलमध्ये इंडियन बिझनेस अँड प्रोफेशनल काऊन्सिलतर्फे ग्रीन माईंड्स, या  प्रदूषणविरहित पर्यावरणासाठी पुनर्वापर आणि चिरकाल टिकणारे उपाय, या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी संयुक्त अरब अमीरात सरकारचे  पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया विषयाचे सल्लागार महेर अल काबी रीना वीज; विजय बैंस; समिअल्लाह खान; कार्तिक रमण आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश सर्व आघाड्यांवर सर्व क्षेत्रात प्रगती करीत असून संपूर्ण जगातून  भारतात उद्योग, व्यवसाय विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढत आहे. भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. संयुक्त अरब अमीरात आणि भारताने संयुक्तपणे प्रयत्न करून दोन्ही देशांत व्यापार-उद्योग वाढविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

संयुक्त अरब अमीरातचे राजे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये विशेषतः दुबईत मोठ्या प्रमाणात भारतीय व्यापार आणि वास्तव्य करीत आहेत. त्यांना कोणताही त्रास नाही. त्यांना सरकारचे चांगले सहकार्य मिळत असते. भारताची राजधानी दिल्ली आहे आणि आर्थिक राजधानी मुंबई आहे तसेच संयुक्त अरब अमीरातची राजधानी अबुधाबी आहे आणि आर्थिक राजधानी दुबई आहे. संयुक्त अरब अमीरात आणि भारत या दोन्ही देशांनी मिळून पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देऊ; व्यापार-उद्योग वाढवू तसेच जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करूया. भारतात मोदी सरकारच्या नेतृत्त्वात सौर ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती आणि वापर होत आहे. प्लास्टिकमुक्त शहरे करण्यासाठी भारतात प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने जगात सर्वच देशांनी पर्यावरण रक्षणाचा संवर्धनाचा विचार करावा असे आवाहनही रामदास आठवलेंनी केले.

या परिषदेस भारतातून रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, तोसिफ पाशा आणि जावेद अहमद उपस्थित होते. 

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content