Homeपब्लिक फिगरमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा!

या राज्यात कायद्या आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. आपल्या आया-बहिणींना, माय-भगिनींना नग्न करून नाचवले जात आहे. हा नंगानाच थांबवला जात नसेल तर आम्हाला नाईलाजास्तव राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी लागेल. इतकेच नव्हे तर आज आम्ही तशी मागणीच करत आहोत, असे भारतीय जनता पार्टीचे सदस्य सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

प्रश्नोत्तराच्या तासात श्वेता महाले यांनी जळगावमधल्या आशादीप शासकीयवसतीगृहातल्या एका महिलेला नग्न करून तिला नाचवले गेल्याच्या घटनेविषयीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उपप्रश्नांवर उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची नोंद घेतली जाईल, असे थातुरमाथूर उत्तर दिले. त्यावर संतप्त झालेल्या मुनगंटीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. या राज्यात एका महिलेल्या नग्न करून नाचवले जाते आणि तिची व्हिडिओ क्लिप तयार करून व्हायरल केले जाते आणि सरकार फक्त त्याची नोंद घेते. हे काय चालले आहे. इतकी संवेदनाहीन झाले आहे की काय हे सरकार, असा सवाल त्यांनी केला. या सरकारला राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखता येत नाही. खरे तर निवडून आलेले सरकार बरखास्त व्हावे, अशी आमचीही इच्छा नाही. मात्र, नाईलाजाने आज आम्हाला ही मागणी करावी लागत आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी या प्रकरणाची चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे जाहीर केले. या समितीत जिल्हाधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आदींचा समावेश आहे. गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर विरोधक शांत झाले.

याच काळात नवाब मलिक यांनी मुनगंटीवार सरकारला धमकी देत असल्याचे सांगत हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करत सरकारने संवेदनशील पद्धतीने काम करावे यासाठीच मुनगंटीवार यांनी असे वक्तव्य केल्याचे सांगितले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी वक्तव्य तपासून घेतले जाईल व त्यातला आक्षेपार्ह भाग काढला जाईल, असे स्पष्ट केले.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content