Homeएनसर्कलराज्यात १२ची परीक्षा...

राज्यात १२ची परीक्षा २३ तर १०वीची २९ एप्रिलपासून!

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिलपासून तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी)ची लेखी परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.

मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षामंडळ संचालक दिनकर पाटील उपस्थित होते.

इयत्ता 12 वीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 एप्रिल ते  22 एप्रिल दरम्यान होईल तर लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल यादरम्यान होतील तर लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येतील. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. राज्यात इ. 9वी ते इ.12वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून 18 जानेवारी 2021पासून 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत व 21 हजार 287 शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेवून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे 76.8% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहितीही प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिली.

बालविवाह रोखण्यासाठी विशेष मोहीम

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू असल्यामुळे या कालावधीत पालकांकडून मुलींचे शिक्षण थांबवून त्यांची लग्ने लावून देण्याची शक्यता जास्त आहे. अशा स्वरूपाचे बालविवाह रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जादा फी वसुलीविरूद्ध योग्य बाजू मांडू

अनेक शाळांकडून पालकांकडे जादा फी वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्याविरूद्ध राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. याविरूदध मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तेथे योग्य ती बाजू मांडण्यात येईल, असेही प्रा. गायकवाड म्हणाल्या.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content