Homeकल्चर +हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात...

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून ते रोमच्या ऐतिहासिक आणि मोहक रस्त्यांपर्यंतच्या लोकेशन्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

कियारा अडवाणी म्हणाली की, “इथे अगदी योग्य प्रमाणात ऊन आणि सुखद गारवा होता. मला इथेच थांबावं, आराम करावा आणि या थर्मल पूलमध्ये पोहत राहवं असं सतत वाटत होतं. हे एकदम स्वप्नवत आणि मनमोहक आहे.”

कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस म्हणाला की, “टस्कनीने आम्हाला कमालीचं सौंदर्य दिले आहे. इथलं रंगसंगतीचं दृश्य अचूक आहे. ही लोकेशन गाण्याला एक वेगळी उंची देते.”

दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाले की, “या प्रेमगीतासाठी अशी पार्श्वभूमी हवी होती जी प्रेम, प्रवास आणि नात्यांची ऊर्जा दाखवू शकेल. दोन व्यक्ती प्रेमात आहेत आणि एकत्र जग पाहत आहेत, अशी भावना निर्माण करणारी लोकेशन म्हणून इटली निवडल्यावर मी खूप आनंदी होतो. रोममध्ये गेल्यावर मला वाटलं की, कोलोसियम, स्पॅनिश स्टेप्स आणि ट्रेवी फाउंटन या आयकॉनिक जागांवर चित्रिकरण करणं आवश्यक आहे. याठिकाणी शूटिंगसाठी परवानगी मिळवणं खूपच कठीण होतं, पण सुदैवाने सर्व काही जमून आलं आणि आम्ही त्या सर्व ठिकाणी शूट करू शकलो. हे गाणं तयार करताना संपूर्ण टीममध्ये एक सकारात्मक ऊर्जा होती. हे एक ‘फील गुड’ गाणं आहे. आम्हाला हे बनवताना खूप आनंद मिळाला आणि आम्ही प्रेक्षकांनाही तोच आनंद मिळेल अशी आशा करतो.”

‘वॉर 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे आणि तो आदित्य चोप्रा यांनी निर्मित केलेला आहे. हा चित्रपट येत्या 14 ऑगस्टला हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content