Homeएनसर्कलकारगिल विजयाच्या स्मरणार्थ...

कारगिल विजयाच्या स्मरणार्थ दिल्लीत ‘ऑनर रन’ आयोजित!

कारगिल युद्धातील भारतीय सैन्याच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ, भारतीय सैन्याने माजी सैनिकांची  अर्ध  मॅरेथॉन ‘ऑनर रन’ काल दिल्लीत आयोजित केली होती. ‘ऑनर रन’ या संकल्पनेंतर्गत भारतीय सैन्य, निवृत्त सैनिक, सर्वसामान्य जनता आणि विशेषत: तरुण यांच्यातील बंध अधिक दृढ करणे हा उद्देश होता.

कार्यक्रमादरम्यान शूरवीरांना आदरांजली वाहताना विविध भागातून ‘ऑनर रन’मध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी आपल्या राष्ट्राची कुवत, क्षमता आणि उर्जा अधोरेखित केली. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी अनेक लष्करी सैनिक, निवृत्त सैनिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘ऑनर रन’ ही मॅरेथॉन चार श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आली होती. 

ऑनर रन

21.1 किमीच्या पहिल्या श्रेणीला ‘कारगिल रन’ असे नाव देण्यात आले. इतर तीन श्रेणींमध्ये 10 किमी धावण्याची ‘टायगर हिल रन’, 5 किमी धावण्याची ‘तोलोलिंग रन’ आणि 3 किमी धावण्याच्या ‘बटालिक रन’ चा समावेश होता. 14,000 हून अधिक सेवारत कर्मचारी, निवृत्त सैनिक, एनसीसी कॅडेट्स, लष्करी जवानांचे कुटुंबिय आणि विविध वयोगटातील नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी विविध श्रेणीतील विजेत्यांना पदके, प्रमाणपत्रे आणि आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित केले. कारगिल युद्धातील भारतीय सैन्याच्या विजयाची माहिती देणार्‍या भारतीय लष्करातील निवृत्त सैनिकांच्या विभागातर्फे एका प्रदर्शनाचे आयोजन ही यावेळी करण्यात आले होते. या दरम्यान स्पर्धकांनी विविध स्टॉल्सना भेट देऊन या विजयाच्या उत्सवात त्यांच्या सहभागाचे कौतुक केले.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content