Homeटॉप स्टोरी.. म्हणून मंगळवारीच...

.. म्हणून मंगळवारीच अशोक चव्हाण झाले भाजपावासी!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा अनिश्चित झाल्यामुळे तसेच राज्यसभा निवडणुकीसाठी मतदार जाहीर करण्यात अडचण होऊ नये यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टीतला प्रवेश आज तातडीने उरकण्यात आला. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून उद्यापर्यंत जाहीर होणाऱ्या यादीत त्यांचे नाव असणार असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या गुरूवारी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार होते. यात त्यांचा छत्रपती संभाजी नगर येथे एक कार्यक्रमही होता. परंतु पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौऱ्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली. त्यातच राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना त्याचदिवशी पक्षप्रवेश देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविणे शक्य होणार नाही. या साऱ्या बाबी लक्षात घेऊन आजच चव्हाण यांचा पक्षप्रवेश उरकून घेण्याचा निर्णय भाजपाच्या नेत्यांनी घेतला.

त्यानुसार दुपारी एक वाजल्यानंतर मुंबईत भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण तसेच त्यांचे समर्थक माजी आमदार अमर राजुरकर यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी चव्हाण यांनी रीतसर प्रवेशशुल्क देत पावती घेत प्रवेशातली कोणतीही कायदेशीर अडचण ठेवली नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसमधले जनाधार असलेले अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचे सांगितले. चव्हाण यांनी यावेळी भाजपाला मजबूत करण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण स्वीकारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content