Homeब्लॅक अँड व्हाईटगोव्यातल्या पासपोर्टसाठीच्या अर्जदारांनो...

गोव्यातल्या पासपोर्टसाठीच्या अर्जदारांनो सोमवारी भेटीच्या वेळा बदला..

केंद्र सरकारने सोमवार, 22 जानेवारी 2024 रोजी (दुपारी 2:30 वाजेपर्यंत) अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर केलेल्या अर्ध्या दिवसाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने अर्जदारांना त्यांच्या ठरलेल्या भेटीच्या वेळा पुनर्निर्धारित करण्याची विनंती केली आहे.

केंद्र सरकारची सर्व कार्यालये 22 जानेवारी 2024 रोजी अडीच वाजेपर्यंत अर्ध्या दिवसासाठी बंद राहतील. हे लक्षात घेऊन, गोव्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने पारपत्र अर्जदारांना विनंती केली आहे ज्यांनी 22 जानेवारी 2024 (दुपारी 2:30 वाजेपर्यंत) पणजीतील पारपत्र सेवा केंद्र आणि मडगाव येथील पोस्ट ऑफिस पारपत्र  सेवा केंद्र येथे पारपत्रासाठी भेटीची वेळ निश्चित केली आहे त्यांनी त्यांच्या ठरलेल्या भेटीच्या वेळा पुनर्निर्धारित कराव्या, अशी  विनंती केली आहे. भेटीच्या वेळेचे पुनर्निर्धारण अधिकृत संकेतस्थळावर लॉगइन करून किंवा एमपासपोर्ट सेवा मोबाइल ॲप वापरून केले जाऊ शकते.

प्रभावित अर्जदारांच्या सोय सुनिश्चित करण्यासाठी या सुट्टीमुळे ज्यांच्या भेटी रद्द झाल्या आहेत त्यांच्यासाठी अतिरिक्त भेटीचा प्रयत्न उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींना भेटीच्या वेळा पुनर्निर्धारित करण्याबाबत माहिती देण्यासाठी एसएमएसद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content