Homeचिट चॅटआयसीएसई (१०वी) व...

आयसीएसई (१०वी) व आयएससी (१२वी) परीक्षांमध्ये मुलींची बाजी!

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयसीएसई), या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे निकाल काल जाहीर करण्यात आले. आयसीएसई (दहावी) बोर्डाचा निकाल ९८.९४ टक्के लागला आहे तर आयएससी (बारावी) बोर्डाचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. आयसीएसई (दहावी)च्या निकालामध्ये मुलींनी चांगली कामगिरी बजावली असून यात मुलींचे पास होण्याचे प्रमाण ९९.२१ टक्के आहे तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९८.७१ टक्के आहे. तसेच आयएससी (बारावी)च्या निकालांमध्येही मुलींनी बाजी मारली असून ९८.०१ टक्के मुली पास झाल्या आहेत तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९५.९६ टक्के आहे.     

आयसीएसई (दहावी)च्या निकालांमध्ये भारतात पश्चिम भागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून या भागातील ९९.८१ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यापाठोपाठ दक्षिण भागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९९.६९ टक्के आहे. आयएससी (बारावी)च्या निकालांमध्ये दक्षिण भागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून या भागातील ९९.२० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यापाठोपाठ पश्चिम विभागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९८.३४ टक्के आहे.

मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यावर्षी सुमारे तीन लाख विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते, जे निकालाची वाट पाहत होते. अखेर काल दुपारी तीन वाजता निकाल जाहीर झाले. जर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास ते पुन्हा तपासणीसाठी अर्ज करू शकतात. ही सुविधा २१ मेपर्यंत उपलब्ध राहिल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content