Homeहेल्थ इज वेल्थमानसिक आजारांबद्दलच्या जागृतीसाठी...

मानसिक आजारांबद्दलच्या जागृतीसाठी डॉ. बत्रांचे ‘फील गुड..’

प्रख्यात होमियोपथीतज्ज्ञ, डॉ. बत्राज हेल्थकेअर, या सर्वात मोठ्या होमियोपथी क्लिनिकच्या शृंखलेचे संस्थापक पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी आपल्या ‘फील गुड, हील गुड. स्टेइंग हॅप्पी विथ होमियोपथी’, या त्यांच्या १०व्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन केले. ब्लूम्सबरीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन

सोहळ्यात मानसिक व भावनिक आरोग्यावर अत्यंत उपयुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात मंदिरा बेदी, राजीव बजाज, मधू, झायेद खान आणि डॉ. आशीष कॉन्ट्रॅक्टर सहभागी झाले होते. या चर्चासत्राचे संचालन तारा देशपांडे यांनी केले.

याप्रसंगी डॉ. बत्रा म्हणाले की, भावनिक आणि मानसिक आरोग्याने त्रस्त असलेल्या लोकांवर उपचार करतानाचे गेल्या ५० वर्षांतील अनुभव मी या पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकात प्रतिबंध, व्यसन न जडणारे आणि सुरक्षित उपचारपद्धत आणि चिंतातुरता, नैराश्य, एडीएचडी, तणाव, एकटेपणा इत्यादी समस्यांची चर्चा केली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून या फारशा चर्चा होत नसलेल्या समस्यांना हातळण्यासाठी जागरुकता निर्माण करणे, लोकांमध्ये चर्चा घडवून आणणे आणि उपचार देण्याचा मी प्रयत्न केला आहे.

सहा कोटींहून अधिक भारतीयांना गंभीर स्वरुपाच्या मानसिक आजारांनी ग्रासलेले आहे. दुर्दैवाने भारताला आत्महत्त्येची राजधानी म्हटले जाते. भारतात दर वर्षी २.६ लाखांहून अधिक आत्महत्त्येची प्रकरणे घडतात. ‘फील गुड, हील गुड. स्टेइंग हॅप्पी विथ होमियोपथी’ या पुस्तकाच्या माध्यमातून मानसिक व भावनिक आरोग्याच्या वाढत्या समस्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यात आली आहे आणि उपायही देण्यात आले आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशनाआधीच ॲमेझॉनवरील आरोग्य, फिटनेस आणि न्यूट्रिशन कॅटेगरीमधील पहिल्या दहा पुस्तकांमध्ये या पुस्तकाची वर्णी लागली आहे.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content