Tuesday, May 6, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसवक्फनंतरची आज पहिली...

वक्फनंतरची आज पहिली जुम्मा नमाज! ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त!!

वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर आज पहिल्यांदाच मुसलमानांकडून पढली जाणारी पहिली जुम्माची नमाज असून एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातल्या अनेक भागात मुस्लीम मोहल्ल्याच्या परिसरात पोलीसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे.

वक्फ बोर्डाच्या कायद्यात झालेल्या सुधारणांना बहुतांशी सर्वच मुस्लीम संघटनांनी तसेच विरोधी राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. या सुधारणांविरूद्ध आजच्या नमाजनंतर देशभरात मुसलमानांनी निदर्शने करावी, असे आवाहन अनेक मुस्लीम संघटनांनी तसेच त्यांच्या धर्मगुरूंनी केले आहे. त्यामुळे आता नमाज संपल्यानंतर मुसलमानांकडून निदर्शने केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार तसेच पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये ठिकठिकाणी पोलिसांनी ध्वजसंचलन केले. अनेक ठिकाणी राज्य राखीव पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

अनेक मुस्लीम संघटनांनी तसेच व्यक्तींनी वक्फ बोर्ड कायद्याच्या सुधारणांविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या सर्व याचिकांवर एकत्रितपणे १६ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या सुधारणांविरूद्ध सह्यांची मोहीमही राबविण्यात येत असून सुमारे एक कोटी सह्या याकरीता गोळा केल्या जाणार आहेत.

Continue reading

‘सजना’चे ‘आभाळ रातीला..’ प्रेक्षकांसमोर!

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित सजना चित्रपटातील "आभाळ रातीला" या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला नवा स्पर्श दिला. प्रेम, नातेसंबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण मांडणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट "सजना" या चित्रपटातील नवीन गाणं "आभाळ रातीला" प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. प्रेम...

मुंबई महापालिकेकडून आजपासून पाळीव प्राण्यांची विष्ठाही संकलित

वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधी आदींच्या संकलनासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलन सेवेची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. याअंतर्गत आजपासून पाळीव प्राण्यांची विष्ठा आणि इतर विशेष कचऱ्याच्या संकलनाची सेवा सुरू करण्यात आली...

ईश्वरी भिसेंच्या बाळांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री निधीतून २४ लाख!

पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात प्रसूतीनंतर मरण पावलेल्या ईश्वरी भिसे यांची जुळी मुलेही आज सुरक्षित जीवनासाठी संघर्ष करत असून त्यांच्या या संघर्षमय प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सढळ हस्ते साथ दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतून या जुळ्या बालकांवरील उपचारांकरीता २४...
Skip to content