Homeन्यूज ॲट अ ग्लांसवक्फनंतरची आज पहिली...

वक्फनंतरची आज पहिली जुम्मा नमाज! ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त!!

वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर आज पहिल्यांदाच मुसलमानांकडून पढली जाणारी पहिली जुम्माची नमाज असून एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातल्या अनेक भागात मुस्लीम मोहल्ल्याच्या परिसरात पोलीसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे.

वक्फ बोर्डाच्या कायद्यात झालेल्या सुधारणांना बहुतांशी सर्वच मुस्लीम संघटनांनी तसेच विरोधी राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. या सुधारणांविरूद्ध आजच्या नमाजनंतर देशभरात मुसलमानांनी निदर्शने करावी, असे आवाहन अनेक मुस्लीम संघटनांनी तसेच त्यांच्या धर्मगुरूंनी केले आहे. त्यामुळे आता नमाज संपल्यानंतर मुसलमानांकडून निदर्शने केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार तसेच पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये ठिकठिकाणी पोलिसांनी ध्वजसंचलन केले. अनेक ठिकाणी राज्य राखीव पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

अनेक मुस्लीम संघटनांनी तसेच व्यक्तींनी वक्फ बोर्ड कायद्याच्या सुधारणांविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या सर्व याचिकांवर एकत्रितपणे १६ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या सुधारणांविरूद्ध सह्यांची मोहीमही राबविण्यात येत असून सुमारे एक कोटी सह्या याकरीता गोळा केल्या जाणार आहेत.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content