Homeबॅक पेजघ्या प्राण्यांच्या उपजत...

घ्या प्राण्यांच्या उपजत बुद्धिमत्तेचा वेध!

प्राण्यांना बुद्धिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का? त्यांना मन असतं का? भावना असतात का? स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव असते का? आत्मभान असतं का? काही वेळा प्राण्यांची हुशारी बघून आपल्यावर आश्चर्यानं तोंडांत बोट घालायची पाळी येते. कधीकधी तर ते अशा काही करामती करतात, की आपण चक्रावूनच जावं. हे सगळं ते उपजत प्रेरणेनं करतात की विचारपूर्वक? माणसाच्या तुलनेत प्राण्यांची बुद्धिमत्ता कुठल्या पातळीवर असते? मुळात बुद्धिमत्ता म्हणजे तरी काय?

मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि चिलटापासून ते चिंपँझीपर्यंत अनेक प्राण्यांवर गेल्या पाच-सहा वर्षांत ‘वर्तनशास्त्र’ या विषयासंदर्भात प्रचंड संशोधन झालं आहे. त्याआधारे या प्रश्नांचा धांडोळा घेणारं हे पुस्तक आहे ‘आपले बुद्धिमान सोयरे’! शास्त्रशुद्ध पद्धतीनं, काटेकोर शब्दांत पण ललित अंगानं लिहिलेलं. खुसखुशीत भाषेत, भरपूर उदाहरणांच्या साहाय्यानं विषय सोपा करून सांगणारं. प्राण्यांबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकानं वाचायलाच हवं, असं आगळंवेगळं पुस्तक.

आपले बुद्धिमान सोयरे

लेखक: सुबोध जावडेकर

मूल्य- २६० ₹. / पृष्ठे- २२८

सवलतमूल्य- २३० ₹.

टपालखर्च- ५० ₹.

एकूण- २८० ₹. घरपोच

प्राण्या

पुस्तक खरेदीसाठी संपर्क- ग्रंथ संवाद वितरण (8383888148, 9404000347)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

वाचनीय ऐतिहासिक कादंबरीः कोणार्क!

एखाद्या ऐतिहासिक विषयावरील कादंबरी वाचायला लोकांना अजूनही आवडतं. कोणार्क, ही अशाच एका कादंबरीचा मराठी अनुवाद आहे जी ३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९२मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या कादंबरीचा परिचय आज करून देत आहे. कोणार्क... उडिया भाषेतील प्रतिभासंपन्न लेखिका डॉ. प्रतिभा राय...

वाचा मार्क्स आणि विवेकानंद, एकाचवेळी!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या दोघांच्या स्थापनेचे हे शताब्दी वर्ष. डाव्या-उजव्या विचारधारांच्या शताब्दीच्या वातावरणात साधकबाधक, समतोल चर्चेचा आणि कालसुसंगत निष्कर्षांचा आदर्श वस्तुपाठ ठरेल, असे हे पुस्तक.. पी. परमेश्वरन यांनी लिहिलेलं 'मार्क्स आणि विवेकानंद' हे पुस्तक. या...

ग्रामीण भागातल्या भयावह परिस्थिती मांडणारी ‘गोष्ट नर्मदालयाची’!

देशाने स्वातंत्र्य मिळवलं, त्याला आता ७८ वर्षं पूर्ण झाली. पण आजही ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे. शिक्षणाचं तर विचारुच नका. हे पुस्तक वाचताना वाचकांच्या डोळ्यांतून अश्रू आपोआपच कधी झिरपतील, हे लक्षातच येणार नाही. हे पुस्तक शहरातील प्रत्येक कुटूंब सदस्यांसमोर...
Skip to content