Homeबॅक पेजसत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांचेही...

सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांचेही थिरकतात पाय तेव्हा…!

हल्ली रोज समाज माध्यमांवर वेगवेगळे संदेश येताहेत आणि त्यातून आयुष्य संपविण्याच्या गोष्टींचाच उहापोह करण्याचे उद्योग सुरु असल्याचे जाणवते. याच पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरात दहिसर येथील सत्तरी गाठलेल्या, ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी पालवी ज्येष्ठ नागरिक नावाने एक संस्था उभी केली आणि मल्ल्या वराडकर फ्रेंड्स (मित्र मंडळ) या नावाने एक वाद्यवृंद तयार केला. ‘गाणी आपली, गाणी मनातली आणि गाणी आठवणीतली’ या शीर्षकाखाली रवि मल्ल्या यांनी हा जामानिमा समाजासमोर आणला. लेखन, निवेदन त्यांचेच.

विविध क्षेत्रातील निवृत्त झालेल्या उच्चपदस्थ स्त्री-पुरुषांनी या वाद्यवृंदाच्या माध्यमातून आपापल्या कलागुणांना वाव दिला. निर्मात्या वृंदा मल्ल्या यांनी बोरीवली पूर्व येथील सांस्कृतिक भूमी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या अभिनव नगरातील ॲम्पी थिएटर येथे भावगीते, भक्तिगीते यापासून तर उडत्या गाण्यांपर्यंतचा नजराणा सादर केला आणि हां हां म्हणता सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ रसिक प्रेक्षकांचे पाय थिरकू लागले. संगीता मिरकर, अजित मोरये, मंजिरी आजरेकर, उमेश लाड, रश्मी मुळे, राजन पट्टण या गायकांनी गायिलेली गाणी ऐकताना साक्षात लतादीदी, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर, महंमद रफी, किशोरकुमार, जयवंत कुलकर्णी आदी कसलेले आणि मनामनात घर करुन बसलेले गायकच आपल्या समोर गाताहेत की काय, असा भास होत होता.

घशाच्या त्रासामुळे नाईलाजाने गाणे सोडावे लागलेल्या रवि मल्ल्या यांनी खुमासदार सूत्रसंचालन करताना या कार्यक्रमात जान आणली. भूषण मुळे, शिरीष वराडकर, अजित मोरये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवि मल्ल्या यांच्या खांद्याला खांदा भिडवून परिश्रम घेतले. विशेष म्हणजे आयर्लंडचे दोन वेळा पंतप्रधानपद भूषविलेल्या डॉ. लिओ वराडकर यांच्या मातोश्री माणिकताई वराडकर वयाच्या ९४व्या वर्षीही या सत्तरी ओलांडलेल्या ‘युवकांना’ आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या. शिवभक्त राजू देसाई आणि पाणीवाली बाई म्हणून ओळखण्यात येणाऱ्या समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या पठडीत तयार झालेल्या (माणिकताईसुद्धा मृणाल गोरे यांच्या सहकारी म्हणून कार्यरत होत्या) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी अणावकर यांनीही आपल्या उपस्थितीने ज्येष्ठांच्या कार्यक्रमाला दाद दिली. ओंकार स्वरुपापासून पसायदानापर्यंतच्या सादरीकरणात मराठमोळी संस्कृती या कार्यक्रमाने अधोरेखित केलेली दिसून आली. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलीपासून मराठमोळ्या चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या गाण्यांचा नजराणा ज्येष्ठांना तारुण्याकडे पुन्हा झुकण्यासाठी खुणावत होता.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content