Homeकल्चर +रविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या मंजुषा पाटील यांच्या गायनाचा!

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, ११ ऑगस्टला विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता होणार असून तो सर्वांसाठी खुला आहे. यावेळी त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव तर संवादिनीवर सुयोग कुंडलकर साथ देणार आहेत.

मंजुषा पाटील ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या गायिका आहेत. त्यांचे संगीताचे शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षी चिंतुबुवा म्हैसकर यांच्याकडे सांगली येथे सुरू झाले. त्यांनी १९९८ तसेच २००३मध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात, बालगंधर्व, भीमसेन महोत्सव, तानसेन समारोह, धारवाड येथील ‘उस्ताद रहमत खाँसाहेब महोत्सव’ अशा व अनेक इतर संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. भारतात अनेक ठिकाणी तसेच शिकागो, लंडन, सिंगापूर, मस्कत या देशांतही शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत. त्यांना पंडित जसराज गौरव, माणिक वर्मा, गुरुवर्य बी. एस. उपाध्ये स्मृती, संगीत शिरोमणी, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि कुमार गंधर्व पुरस्कार मिळाले आहेत.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content