HomeUncategorizedरविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या कल्याणी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीताचा

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दि. १६ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कल्याणी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांना अभय दातार तबल्याची आणि अनंत जोशी संवादिनीची साथ करतील. हा कार्यक्रम पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित केला असून अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

कल्याणी साळुंके, या ग्वाल्हेर-आग्रा घराण्याच्या गायिका असून त्यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडे घेतलं. त्यानंतर पं. वसंतराव कुळकर्णी व डॅा. अशोक रानडे यांच्याकडे तालीम घेतली. डॅा. अरूण द्रविड यांचं मार्गदर्शनही त्यांनी घेतलं. त्या शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीताचेही कार्यक्रम करत असतात. आकाशवाणीच्या त्या अ दर्जाच्या कलाकार आहेत. डॅा. अशोक रानडे यांच्याकडून त्यांनी ‘आवाज जोपासना शास्त्राचे’ शास्त्रशुद्ध मार्गदर्शन घेतले आहे. त्या स्वतःही याचे मार्गदर्शन विविध कार्यशाळांमधून करत असतात. त्यांना ठाणे भूषण पं. राम मराठे पुरस्कार तसेच अन्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content