HomeUncategorizedरविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या कल्याणी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीताचा

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दि. १६ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कल्याणी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांना अभय दातार तबल्याची आणि अनंत जोशी संवादिनीची साथ करतील. हा कार्यक्रम पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित केला असून अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

कल्याणी साळुंके, या ग्वाल्हेर-आग्रा घराण्याच्या गायिका असून त्यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडे घेतलं. त्यानंतर पं. वसंतराव कुळकर्णी व डॅा. अशोक रानडे यांच्याकडे तालीम घेतली. डॅा. अरूण द्रविड यांचं मार्गदर्शनही त्यांनी घेतलं. त्या शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीताचेही कार्यक्रम करत असतात. आकाशवाणीच्या त्या अ दर्जाच्या कलाकार आहेत. डॅा. अशोक रानडे यांच्याकडून त्यांनी ‘आवाज जोपासना शास्त्राचे’ शास्त्रशुद्ध मार्गदर्शन घेतले आहे. त्या स्वतःही याचे मार्गदर्शन विविध कार्यशाळांमधून करत असतात. त्यांना ठाणे भूषण पं. राम मराठे पुरस्कार तसेच अन्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content