HomeUncategorizedरविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या कल्याणी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीताचा

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दि. १६ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कल्याणी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांना अभय दातार तबल्याची आणि अनंत जोशी संवादिनीची साथ करतील. हा कार्यक्रम पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित केला असून अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

कल्याणी साळुंके, या ग्वाल्हेर-आग्रा घराण्याच्या गायिका असून त्यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडे घेतलं. त्यानंतर पं. वसंतराव कुळकर्णी व डॅा. अशोक रानडे यांच्याकडे तालीम घेतली. डॅा. अरूण द्रविड यांचं मार्गदर्शनही त्यांनी घेतलं. त्या शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीताचेही कार्यक्रम करत असतात. आकाशवाणीच्या त्या अ दर्जाच्या कलाकार आहेत. डॅा. अशोक रानडे यांच्याकडून त्यांनी ‘आवाज जोपासना शास्त्राचे’ शास्त्रशुद्ध मार्गदर्शन घेतले आहे. त्या स्वतःही याचे मार्गदर्शन विविध कार्यशाळांमधून करत असतात. त्यांना ठाणे भूषण पं. राम मराठे पुरस्कार तसेच अन्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content