Homeबॅक पेजआजपासून अजित घोष...

आजपासून अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट!

यजमान स्पोर्टिंग युनियनसह एकूण ८ संघांचा सहभाग लाभलेली ४ थी अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आज, २८ फेब्रुवारीपासून ६ मार्च या कालावधीमध्ये खेळविली जाणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यता असणारी स्पर्धा साखळी आणि बाद फेरी या तत्त्वावर घेतली जाईल. या स्पर्धेला कल्याणदास मेहता मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेम इंडिया प्रा. लि. यांचे सहाय्य लाभले आहे. एमसीएचे कार्यकारीणी सदस्य संदीप विचारे आणि दिपेन पारेख यांनीदेखील मदतीचा हात स्पर्धेला देऊ केला. स्पर्धेतील सामने मुंबईच्या माटुंगा जिमखाना आणि न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या मैदानात होतील. 

स्पर्धेतील ८ संघांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक संघाला कमीतकमी ३ सामने खेळण्याची संधी मिळणार असल्याचे स्पर्धेच्या आयोजक, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, भारताच्या माजी महिला कसोटीपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अरुंधती घोष यांनी सांगितले.

गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेतील साखळी सामने २८, २९ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी होतील. उपांत्य फेरीच्या लढती ५ मार्चला रंगणार आहेत. अंतिम फेरीचा सामना ६ मार्च रोजी खेळवण्यात येईल. प्रत्येक सामन्यामधील सर्वोत्तम खेळाडूला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात येईल. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना विशेष पुरस्कार देण्यात येतील. भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडू संगीता डबीर, सुनिता कनोजिया यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घघाटन समारंभ संपन्न होईल. 

स्पर्धेतील संघांची गटवार विभागणी

“अ” गट- स्पोर्टिंग युनियन, माटुंगा जिमखाना, साईनाथ स्पोर्ट्स, नॅशनल

“ब” गट- युरोपेम, ओरिएंटल सी. सी., एम. आय. जी., डॅशिंग स्पोर्ट्स

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content