Homeहेल्थ इज वेल्थलसीकरणामुळे नव्या कोरोनाची...

लसीकरणामुळे नव्या कोरोनाची चिंता नाही!

कोरोना विषाणूच्या जे एन 1 या सब वेरियंटमुळे घाबरण्याची गरज नाही. परंतु सतर्कता पाळणे गरजेचे आहे. कोरोना लसीकरणाने रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ .भारती पवार यांनी काल नागपूरमध्ये दिली.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था – एम्सची पाहणी केली आणि आढावा बैठकही घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि आभा कार्डच्या उपयुक्तेतेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीवेळी मार्गदर्शन केलं. रुग्णांची माहिती त्यांचा आरोग्यविषयक इतिहास याचं संगणकीकरण केलं जात असल्याने फाईल्सची लांबलचक प्रक्रिया हद्दपार करता येऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासारख्या आपत्ती काळासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर दिला असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले.

जनोपयोगी योजनांची माहिती एम्सने करून द्यावी आणि लोकांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय फोनद्वारे समुपदेशन  देऊ केले जाऊ शकते त्याचादेखील रुग्णांना लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात आणि देशात मेडिकल कॉलेजची संख्या, गुणवत्तायुक्त शिक्षण आणि आरोग्यसेवा याबाबत केंद्रातर्फे देऊ करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

‘वसुधैव कुटुंबकम’ तत्वावर पुढील वाटचाल करीत उत्तम संशोधन आधारित मानवसेवा करायची आहे आणि आपल्या देशाला आरोग्यसेवेत आघाडीवर न्यायचे आहे असे आवाहनही भारती पवार यांनी केले. एम्स नागपूरचे संचालक डॉ. हनुमंता राव, वैद्यकीय अधीक्षक श्रीगीरिवार यांनी एम्सच्या विविध उपक्रमांची माहिती पवार यांना दिली.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content