Homeचिट चॅटकामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ...

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५) २५व्या मिनिटाला बरोबरीत रोखले आणि सरस सरासरीच्या बळावर अपराजित ध्रुव जैनने गटविजेतेपदावर झेप घेतली. परिणामी १३ वर्षांखालील गटविजेतेपद पटकाविणाऱ्या अंशुमनचा डबल धमाका मात्र हुकला. अरेना फिडे मास्टर हिरण्मयी कुलकर्णीने ११ व १२ वर्षांखालील मुलींच्या गटात सर्वाधिक गुण घेत दुहेरी विजेतेपद पटकाविले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने झालेल्या स्पर्धेमधील विजेत्या-उपविजेत्यांना संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रमुख सुनील बोरकर, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

परेल येथील आरएमएमएस वातानुकूलीत सभागृहात झालेल्या ८ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत मुलांमध्ये रीयांश कदमने (५ गुण) प्रथम, अंगद पाटीलने (४ गुण) द्वितीय, अधवान ओसवालने (३ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये मायरा गोगरीने (३ गुण) प्रथम, ध्रुवा भोसलेने (३ गुण) द्वितीय, समैरा थोरातने (२ गुण) तृतीय; १० वर्षांखालील मुलांमध्ये राज गायकवाडने (४.५ गुण) प्रथम, अर्णव साठ्येने (३.५ गुण) द्वितीय, शौर्य कोठारीने (३.५ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये थिया वागळेने (४.५ गुण) प्रथम, आराध्या पुरोने (२.५ गुण) द्वितीय, स्वरा मोरेने (२ गुण) तृतीय तर १२ वर्षांखालील मुलांमध्ये व्ही. प्रिजेशने (४.५ गुण) प्रथम, युग संघवीने (४ गुण) द्वितीय, पी. रेयानने (३ गुण) तृतीय पुरस्कार जिंकला.

मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूच्या डावपेचांनी रंगलेल्या कामगार महर्षी आंबेकर स्मृती चषक बुध्दिबळ स्पर्धेच्या संयोजनाचे मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी फिडे इंस्ट्रक्टर राजाबाबू गजेंगी यांनी विजेत्यांचे विशेष कौतुक केले.

Continue reading

मोहना कारखानीस यांच्या साहित्यकृतींवर रंगला परिसंवाद

सिंगापूरस्थित मराठी साहित्यिका मोहना कारखानीस यांच्या 'टेक ऑफ' (कथासंग्रह), 'चेहरे, कहाण्या आणि सिंगापूर’ (लेखसंग्रह)) आणि `चंद्रकळा’ (कवितासंग्रह) या पुस्तकांवर आधारित 'पुस्तकावर बोलू काही’ हा परिसंवाद मुंबईतल्या कांदिवलीत मान्यवर साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत नुकताच रंगला. त्यांचे साहित्य हे सहज हळूवार भावविश्वांचे प्रतिनिधीत्व करते आणि त्यातून समाजमनाला त्या आपल्या जाणीवांचा...

भारतातल्या २ ते ५ टक्‍के व्‍यक्‍ती हायपरहायड्रोसिसने पीडित

भारतातील २ ते ५ टक्‍के व्‍यक्‍ती हायपरहायड्रोसिसने पीडित असण्‍याचा अंदाज आहे. असे असतानादेखील या स्थितीबाबत जागरूकतेचा अभाव आहे. परिणामत: अनेक व्‍यक्‍तींना या वैद्यकीय स्थितीबाबत माहित नाही आणि ते नकळतपणे आजार सहन करतात. वेळेवर उपचार न केल्‍यास या आजाराचा दैनंदिन...

दिल्लीकरांनी अनुभवले मणिपुरी थांग-ता आणि शिवकालीन युद्धतंत्राचे थरारक क्षण!

दिल्लीतील भारत मंडपम् येथे सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद' महोत्सवात भारताच्या गौरवशाली प्राचीन युद्धपरंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्याचा सजीव, थरारक आविष्कार पाहायला मिळाला. या महोत्सवाने उपस्थितांमध्ये...
Skip to content